शाहूवाडी ( प्रतिनिधी ) – आजवरच्या एकाही खासदाराने शाहूवाडी तालुक्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते मात्र खा. धैर्यशील माने खासदार झाल्यापासून या भागाकडे जातीनिशी लक्ष घालून या भागातील रस्ते ,पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यां बरोबरच औदयोगिक वसाहत उभी करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे काम केले आहे . त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुर्गम भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे . त्यामुळे विकासाची हीच गंगा अविरतपणे सुरू राहण्यांसाठी धैर्यशील मानेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन गोकुळचे संचालक कर्ण सिंह गायकवाड यांनी केले .

महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शाहूवाडी तालुक्यातील .खुटाळवाडी , डोणोली , चरण , सैदापूर ,थेरगांव , ससेगाव ,मोळावडे , सावर्डे . सायं. बहिरेवाडी . बजागेवाडी , गोगवे , ठमकेवाडी , वाडीचरण , कड वे ,करूंगळे , औतूर , पुसार्ल , भेंडवडे ,परळे ,निनाई ,लोळाणे ,मानोली ,आंबा , केर्ली ,चांदोली , वारूळ , निळे/भोसलेवाडी आदी गावांचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ते बोलत होते . यावेळी धैर्यशील माने म्हणाले , जिल्हयाच्या दुर्गम भागाचा सर्वार्थाने विकास साधण्याचा ध्यास मी खासदार झाल्यापासूनच घेतला आहे . गेल्या दोन वर्षांत त्याची सुरुवांतही झाली आहे. उर्वरीत कामांना गती देण्यासाठी परत एकदा संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले .

यावेळी सर्जेराव पाटील (पेरिडकर ) .बाळकृष्ण गद्रे.सुभाष इनामदार ,अमरसिंह खोत ,विजय देसाई ,महादेव पाटील ( साळशीकर ) ,बाबा लाड (चरणकर ) पांडुरंग निकम आदीसह कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.