पंतप्रधान मोदी जिथे जाणार, तिथे मविआ जिंकणार : संजय राऊतांचा दावा

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 13 मे ला चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर 20 मे ला पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद मोदी यांचा आज मुंबई उपनगरातील घाटकोपरमध्ये रोड शो होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीने देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर… Continue reading पंतप्रधान मोदी जिथे जाणार, तिथे मविआ जिंकणार : संजय राऊतांचा दावा

राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर एकत्र येणार..?

मुंबई – लोकसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना आपला बिनशर्ती जाहीर पाठिंबा दर्शवला होता. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जाहीर सभा घेऊन त्यांनी आपल्या मनसैनिकांना जाहीर केलं होत. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या आणि भाजपच्या प्रचार सभा घेत असताना पाहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचार करत आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह राज्यातील अनेक… Continue reading राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर एकत्र येणार..?

वाकोल्यात शिंदे – ठाकरे गटात राडा

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर राज्यातील शिवसैनिक दोन गटात विभागाला गेला.काही जणांनी उद्धव ठाकरे  यांची साथ कायम ठेवली तर काही जणांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. मंगळवारी वाकोल्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाल्याच पाहायला मिळालं. भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्वल निकम आणि नीलम गोऱ्हे यांच्या सभेनंतर हा वाद झाला.… Continue reading वाकोल्यात शिंदे – ठाकरे गटात राडा

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक…

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री, भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. राजमाता माधवी राजे शिंदे यांचे दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. माधवी राजे शिंदे या नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या. उद्या (गुरुवार) त्यांचे पार्थिव ग्वाल्हेरला आणले जाणार असून तिथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राजमाता… Continue reading केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक…

गाझामधील हल्ल्यात कर्नल वैभव काळे शहीद…

पुणे (प्रतिनिधी) : भारतीय लष्करामधून निवृत्त झालेले कर्नल वैभव अनिल काळे (वय 46) यांचे गाझामधील एका हल्ल्यात निधन झाले आहे. वैभव काळे हे मूळचे नागपुरमधील लक्ष्मीनगर येथील रहिवाशी होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून वैभव काळे कार्यरत होते. गेल्या वर्षी गाझामध्ये युद्धाला सुरुवात झाल्यापासून आंतरराष्ट्रीय संस्थेच्या एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा… Continue reading गाझामधील हल्ल्यात कर्नल वैभव काळे शहीद…

‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी’ ; संजय राऊतांची मोदींवर टीका

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता पाचव्या टप्प्यातील मतदानाचा जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी येथे जाऊन वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रॉड शो आहे. पंतप्रधान… Continue reading ‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी’ ; संजय राऊतांची मोदींवर टीका

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या

जळगाव: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे सुरक्षा रक्षक महणून काम करणाऱ्या एका एसआरपीएफ जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. प्रकाश कापडे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्याने जळगाव जिल्ह्यात जामनेर येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती पसरताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली.प्रकाश कापडे हे मुंबईत… Continue reading सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या

दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग

दिल्ली : दिल्लीतून एक मोठी घटना समोर येत आहे. येथील आयकर विभागाच्या कार्यालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या मागे आयकर विभागाची इमारत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे.दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीला दुपारी आग लागली आहे. ही आग मोठी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.… Continue reading दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग

‘चंदा लो, धंदा दो’ या महायुतीच्या धोरणामुळे होर्डिंग दुर्घटना : विजय वडेट्टीवार

मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेला महायुती सरकार जबाबदार आहे. सरकारच्या भोंगळ कारभारामुळं ही दुर्दैवी घटना घडली आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप माणसांचा जीव गेला. ‘चंदा लो, धंदा दो’ अशा पद्धतीने महायुतीचा कारभार सुरु असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.आज विजय वडेट्टीवार यांनी घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेची… Continue reading ‘चंदा लो, धंदा दो’ या महायुतीच्या धोरणामुळे होर्डिंग दुर्घटना : विजय वडेट्टीवार

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत ; संजय राऊतांचा दावा  

मुंबई : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जूननंतर कळेल, असा दावा उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय.एका खाजगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले दावेही फेटाळून लावले आहेत.   … Continue reading नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत ; संजय राऊतांचा दावा  

error: Content is protected !!