प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी, युवक कार्यकारिणी जाहीर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रतील सर्वसामान्य लोकांचे लाडके राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी पक्षामध्ये काही महिला, युवक-युवतीनी प्रवेश केला. यामुळे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार बळकट होत असल्याचे मत जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी व्यक्त केले. यावेळी जयराज कोळी यांनी, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू नाव किंवा व्यक्ती नसून चांगल्या विचाराचे… Continue reading प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी, युवक कार्यकारिणी जाहीर…

शौचालय घोटाळ्याची चौकशी व्हावी : प्रविण जनगोंडा (व्हिडिओ)

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पंचायत समितीमध्ये कोविड महामारीच्या काळात संपूर्ण स्वच्छता आणि हागणदारी मुक्तीच्या विशेष मोहीमेतून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सुमारे दोन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याची सखोल चौकशी होऊन दोषीवर कडक कारवाईची मागणी पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा यांच्यासह दलित महासंघ आणि बहुजन रयत परिषदेने केली आहे.

शिवसेनेचा यंदाचा दसरा महोत्सव ‘ऑनलाईन’…

मुंबई (प्रतिनिधी) : येत्या २५ ऑक्टोबरला होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित असतात. मात्र, कोरोनामुळं यंदा दसरा मेळावा होणार नाही, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे.… Continue reading शिवसेनेचा यंदाचा दसरा महोत्सव ‘ऑनलाईन’…

सावर्डे दुमालाच्या उपसरपंचपदी शालाबाई निकम…

म्हालसवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यांतील सावर्डे दुमाला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शालाबाई पांडुरंग निकम यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच संतोषकुमार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा कारंडे होत्या. निकम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. मंडल अधिकारी मदन सूर्यवंशी, तलाठी पांडुरंग धोत्रे यांच्या… Continue reading सावर्डे दुमालाच्या उपसरपंचपदी शालाबाई निकम…

राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा : राजू शेट्टी (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतींचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे सर्वस्व पाण्यात गेले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्याला भरीव नुकसान भरपाई द्वावी, अशी मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी केली आहे.

२ नोव्हेंबरला ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद : राजू शेट्टी (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद २ नोव्हेंबरला जयसिंगपूरमध्ये होणार आहे. स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिषदेची तारीख निश्चित करण्यात आली. यामुळे कोरोनामुळे यंदा ऊस परिषद होणार की नाही, यासंबंधी निर्माण झालेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. प्रत्येक वर्षी ऊस परिषदेत हंगामातील उसाचा दर निश्चित… Continue reading २ नोव्हेंबरला ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद : राजू शेट्टी (व्हिडिओ)

आंबेओहोळ, नागनवाडी प्रकल्प मार्गी लावा : हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि संबंधित प्रांताधिकारी यांची पंधरा दिवसात बैठक घेवून आंबेओहोळ आणि नागनवाडी प्रकल्प पुनर्वसनाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (शुक्रवार) दिली. पावसाळ्यापूर्वी घळभरणी करावी. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी पाटबंधारे विभागाला सांगितले. ते प्रकल्प पुनर्वसन संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.… Continue reading आंबेओहोळ, नागनवाडी प्रकल्प मार्गी लावा : हसन मुश्रीफ

ना. मुश्रीफ म्हणतात, ‘चंद्रकांतदादांच्या कामांच्या सखोल चौकशीची गरज…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजप सरकार सत्तेवर असताना कोल्हापूर जिल्हयातील एकही थेंब पाण्याचा अडवण्यात चंद्रकांत पाटलांना यश आलेले नाही. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते असूनही रस्त्यांची दयनीय अवस्था राहिली. ठेका देऊन अनेक रस्त्यांचीकामे अर्धवट राहिली. म्हणून त्यांच्या काळातील रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. ते आज (शुक्रवार) शासकीय विश्रामगृहातील… Continue reading ना. मुश्रीफ म्हणतात, ‘चंद्रकांतदादांच्या कामांच्या सखोल चौकशीची गरज…

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना रक्ताने सह्या केलेले पत्र…

औरंगाबाद (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासंबंधी कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे राज्यात वातावरण चिघळत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताच्या सह्याचे पत्र लिहिण्यात आल्याची माहिती समोर येत आहेत. मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी पत्र लिहून त्यावर प्रत्येकाने आपल्या रक्ताने सह्या केल्या आहेत. रक्ताच्या साह्य करून हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील… Continue reading मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना रक्ताने सह्या केलेले पत्र…

बाजारभोगावच्या सरपंचपदी बाबासाहेब खोत, तर प्रकाश पोवार उपसरपंच…

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव, काऊरवाडी व मोताईवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. आज (गुरुवार) झालेल्या या निवडणुकीत बाबासाहेब श्रीपती खोत (काऊरवाडी) यांची सरपंचपदी तर प्रकाश रंगराव पोवार (बाजारभोगाव) यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. मंडल अधिकारी बी. एस. खोत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष… Continue reading बाजारभोगावच्या सरपंचपदी बाबासाहेब खोत, तर प्रकाश पोवार उपसरपंच…

error: Content is protected !!