लखनऊ (वृत्तसंस्था): बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे काल लखनऊ येथे निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकाराचा सामना करत होते. मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशीष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली. 

मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशीष यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, तुम्ही जगातील सर्वोत्तम वडील होते. तुम्ही माझ्यावर जावई नाही, तर मुलासारखे प्रेम केले देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.’ आशीष यांच्या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली. मिथिलेश यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका देखील आला होता. त्यानंतर मिथिलेश हे त्यांच्या मूळ गावी म्हणजेच लखनऊ येथे शिफ्ट झाले. तिथेच त्यांचे निधन झाले.
मिथिलेश चतुर्वेदी यांनी ‘भाई भाई’ या चित्रपटामधून पदार्पण केले. त्यानंतर सत्या, ताल, फिजा, रोड, कोई मिल गया, बंटी और बबली, कृष, रेडी, गदर: एक प्रेम कथा, कोई मिल गया आणि गांधी माय फादर यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. २०२० मध्ये रिलीज झालेल्या ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. त्यांनी  कोई मिल गया आणि क्रेजी ४ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. मिथिलेश चतुर्वेदी यांनी मालिका आणि जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे.