कोल्हापुरी ठसका : महापौरपदानंतर फुलस्टॉप…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आमदार, खासदार, मंत्री होण्याची संधी मिळत असते. तो एक उत्तम मार्ग आहे. कोल्हापूर शहर मात्र त्याला आजपर्यंत अपवाद ठरले आहे. महापौर पदानंतर प्रयत्न करूनही तशी संधी कुणालाच मिळाली नाही. सर्वांनाच महापौर पदानंतर फुलस्टॉप घ्यावा लागला हा इतिहास आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण करण्यासाठी राजकारणाचा अनुभव असावा लागतो. असा अनुभव किंवा राजकारणाचे बाळकडू… Continue reading कोल्हापुरी ठसका : महापौरपदानंतर फुलस्टॉप…

‘फास्टॅग’वरून किणी टोल नाक्यावर गोंधळ : वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)

किणी टोल नाक्यावर ‘फास्टॅग’ लेनमधून येणाऱ्या वाहनांना चक्क दुप्पट चार्ज आकारण्यात आल्याने वाहनधारकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे.  

श्री अंबाबाई मंदिराचा महाद्वार दरवाजा खुला : भाविकांत समाधान (व्हिडिओ)

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर श्री अंबाबाई मंदिराचा महाद्वार म्हणजे पश्चिम दरवाजा आज उघडण्यात आला आहे. यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.  

भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहेत. त्यांच्याहस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झालं. हा कार्यक्रम सुरु असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत पहाटे घेतलेला शपथविधी गाजलेला होता.… Continue reading भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

शहरांची नावे बदलून काय होणार..? : थोरातांचा भाजपवर निशाणा

अहमदनगर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करत नाही. निवडणुकांच्या तोंडावर भावनिक मुद्दा पुढे केले जातात. आणि भाजपकडून समाजात तेढ निर्माण करणारे विषय पुढे आणले जातात, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (शुक्रवार) येथे केली आहे. संगमनेरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. थोरात म्हणाले की, सर्वसामान्य माणसांचे… Continue reading शहरांची नावे बदलून काय होणार..? : थोरातांचा भाजपवर निशाणा

गडहिंग्लज सायकल क्लब, नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत हरित  संकल्पासाठी गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आज (शुक्रवार) आयोजन केले होते. या रॅलीची सुरुवात गडहिंग्लज नगरपरिषदेच्या प्रांगणातून करण्यात आली. या सायकल रँलीचा शुभारंभ गडहिंग्लज नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केला. यामध्ये गडहिंग्लज नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, गडहिंग्लज… Continue reading गडहिंग्लज सायकल क्लब, नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली…

दुकान बंद होऊ नये, म्हणून फडणवीसांची टीका : अनिल देशमुख

पुणे (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या कामावर सतत टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोला लगावला आहे. सरकारने चांगले काम केले, तरी फडणवीस टीकाच करणार आहेत. त्यांचे दुकान बंद होऊ नये, म्हणून ते टीका करत असतात, असे देशमुख यांनी म्हटले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहाला आज (शुक्रवार) भेट दिल्यानंतर… Continue reading दुकान बंद होऊ नये, म्हणून फडणवीसांची टीका : अनिल देशमुख

कोरोना लसीच्या वितरणास येणार गती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने कोरोना लसीच्या आयात आणि निर्यातीला कोणतीही मर्यादा आणि परवान्याशिवाय परवानगी दिली आहे. कोरोना लसीचे वेगवान वितरण होण्यासाठी हा सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क (सीबीआयसी) विभागाने कोरोना लसीच्या आयात-निर्यात नियमनात सुधारणा केल्या आहेत. या सुधारणा इलेक्ट्रॉनिक डिक्लेरशन आणि प्रोसेसिंग सुधारणा नियमन २०२० मध्ये केल्या… Continue reading कोरोना लसीच्या वितरणास येणार गती

बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान मोदींची ‘मोठी’ घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बेघर नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. २०२२ पर्यंत देशातील सर्व बेघर नागरिकांना घरे बांधून देण्याची घोषणा मोदी यांनी केली. देशातील ६ राज्यांत भूकंपरोधी घरे बनविण्याच्या योजनेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते आज (शुक्रवारी)  करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हाउसिंग टेक्नोलॉजी चॅलेंज इंडिया अंतर्गत… Continue reading बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान मोदींची ‘मोठी’ घोषणा

चंद्रकांतदादांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’तून आपल्यावर गलिच्छ भाषेत टीका होत असल्याविषयी थेट संपादक रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘सामना’मधून गलिच्छ टीका झाली, असे म्हणणे योग्य नाही. ‘सामना’त ठाकरी शैलीचा वापर केला जातो. तोच ‘सामना’चा ब्रँड आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषा ‘सामना’त लिहिली… Continue reading चंद्रकांतदादांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

error: Content is protected !!