बेळगाव ( प्रतिनिधी ) जायंटस् ग्रुप बेळगाव मेनच्यावतीने गोवावेस जवळील महावीर भवनच्या बाजूच्या गार्डनमध्ये पक्षांसाठी पाणी ठेवण्यासाठी मातीच्या भांडयांचे वाटप सकाळच्या वेळी फिरावयास येणाऱ्या लोकांना करण्यात आले. यावेळी त्यांना छतावर, बाल्कनी, घराच्या बागेमध्ये, भांडयामध्ये पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

ह्या असलेली पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळावी. पाईप लावून गाडी धुणे, रस्त्यावर पाणी मारणे याबाबत जागृती करण्यात आली. पक्षी, प्राणी निर्सगाचा समतोल राखण्यात महत्वाची भुमिका बजावतात असे अध्यक्ष अविनाश पाटील यानी आपले विचार व्यक्त केले.

याप्रसंगी सचिव यल्लापा पाटील, मदन बामने, सुनिल मुतगेकर, संजय पाटील , मुकूंद महागावकर, अनिल चौगूले, आनंद कुलकर्णी, प्रकाश तांजी, विश्वास पवार, पद्मप्रसाद हुली, मॉर्निग वाकर्स आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.