दिल्ली : नीट पेपर फुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करून विध्यार्थ्यांच्या हितासाठी लोकसभेत चर्चा करण्याची मागणी केली. लोकसभेत नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणावरून राहुल गांधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

लोकसभेत या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. विरोधकांकडून  या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्याची करण्यात आली  मात्र सभापतींनी त्यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान वेळ देण्याचे आश्वासन दिले. यावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले.

यावेळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना शांततेचे आवाहन केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान त्यांना पुरेसा वेळ मिळेल असे आश्वासनही त्यांनी  दिले. मात्र, विरोधकांनी यावरून गोंधळ केल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. सोमवार नंतर या विषयावर चर्चा झाल्यावर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या मुद्द्यावर सरकार कशी भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.