दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : समृद्धी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचवडे संचलित. समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथील मधुरा दत्तात्रय बोटे या विद्यार्थिनीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.

मधुरा ही विद्या मंदिर दिंडनेर्ली शाळेची विद्यार्थिनी असून तिने 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर श्रेयस रोहित गायकवाड 100 पैकी 98 गुण मिळवून राज्यात द्वितीय आला आहे. तर शिवानी प्रवीण कोइगडे, अंतरा रघुवीर ढेरे, राजवीर महेश बोटे. हे सर्व विद्यार्थी 100 पैकी 96 गुण मिळवून राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

मधुराने राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने तिच्यावर आणि मार्गदर्शक शिक्षिकांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका वळवी, वर्गशिक्षिका नयन जमदाडे, सविता पाटील, आई वडील, आजी आजोबा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.