रांगोळी (प्रतिनिधी) : ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत गावचावडी समोरील ध्वजारोहण भारतीय जवान तानाजी सूर्यवंशी यांच्या मातोश्री भारती मोहन सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट अखेर सर्व घरांवर व शासकीय ठिकाणी तिरंगा ध्वज लावला जात आहे. रांगोळी गावचावडी समोरील ध्वजारोहणाचा मान तलाठी यांचा असतो, परंतु येथील तलाठी एस. ए. गवडी यांनी पहिल्या दिवसाच्या ध्वजारोहणाचा मान भारती सूर्यवंशी यांना देऊन एक नवीन परंपरा सुरू केली. यावेळी तलाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी नागरिक, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.