कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दि. ८ जुलैपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष २४ तास सुरु असून, ०२३१- २६५९२३२, ०२३१-२६५२९५०, ०२३१-२६५२९५३, ०२३१-२६५२९५४  टोल फ्री क्रमांक १०७७ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.