डाके, जोशी यांच्याकडून शिवसैनिकांची निष्ठा शिकावी : राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांच्याकडून कडवट शिवसैनिकांची निष्ठा शिकून घ्यावी, असा सल्ला शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि लीलाधर डाके यांची भेट घेतली. या भेटीवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना खोचक सल्ला दिला आहे. डाके आणि जोशी हे… Continue reading डाके, जोशी यांच्याकडून शिवसैनिकांची निष्ठा शिकावी : राऊत

संजय राऊत यांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) :  सत्तांतराचे स्वप्न संजय राऊतांना पाहू द्या. ते नेहमी स्वप्ने पाहत असतात. राज्यात १६६ लोकांचे सरकार असून, लोकसभेत १२ लोकांनी सभापतींना पत्र दिले आहे. दोन्ही सदनात आमच्याकडे दोन तृतीयांश संख्याबळ असल्यामुळे पूर्णपणे आमचे सरकार मजबूत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खा. संजय राऊतांना लगावलाय. यावेळी शिंदे यांनी लिलाधर डाके यांची भेट घेतली.… Continue reading संजय राऊत यांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या : मुख्यमंत्री

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न चिन्ह

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारास दिल्लीतून हिरवा कंदिल अद्याप मिळालेला नाही. यामुळे विस्तार जुलै अखेर ही होणार का? यावर प्रश्न चिन्ह उपस्थितीत झाले आहे. न्यायालयांनी प्रक्रिया स्पष्टता अधिक झाल्यावर विस्तार करावा, असे मत दिल्ली भाजपा नेत्यांचे आहे. न्यायालयाकडून स्पष्टता आल्यानंतरच विस्ताराचा मुहूर्त निघू शकतो, असे सांगण्यात येत आहे.  मंत्रिमंडळ विस्तारात भाजप हायकमांडकडून राज्यातील काही वरिष्ठ… Continue reading राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न चिन्ह

मुख्यमंत्र्यांचे निर्णय दिल्लीत; आपण काय करणार? : अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करणार आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे निर्णय दिल्लीत होतात, त्याला आपण काय करणार, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदेंवर केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे. अजित… Continue reading मुख्यमंत्र्यांचे निर्णय दिल्लीत; आपण काय करणार? : अजित पवार

‘पोलीस गृहनिर्माण’ला निधीची कमतरता भासणार नाही : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत लवकरच सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पोलिसांच्या घरांची परिस्थिती बदलून टाकण्याचा आमचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. पोलीस गृहनिर्माण योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे आश्वासन देखील… Continue reading ‘पोलीस गृहनिर्माण’ला निधीची कमतरता भासणार नाही : मुख्यमंत्री

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान

मुंबई (प्रतिनिधी) : जे शेतकरी नियमित कर्जफेड करत होते, त्यांना ५० हजार रुपये अनुदानपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज (बुधवार) मुंबईत शिंदे सरकारच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिंदे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरपरिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना शासनाने मदत केली होती, त्यातून काही नावे वगळण्यात आले होते; मात्र… Continue reading नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान

राज्य मंत्रिमंडळाचा दोन दिवसांत विस्तार

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नव्या सरकारमध्ये शपथ घेऊन आज जवळपास २५ दिवस उलटले; मात्र अजूनही नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडलेला नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे राज्य आणि सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत. हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही… Continue reading राज्य मंत्रिमंडळाचा दोन दिवसांत विस्तार

ठाकरेंची मुलाखत ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’च्या मॅचसारखी : संदीप देशपांडे

मुंबई (प्रातिनिधी) : टीव्हीवरील ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ची मॅच असते ना, ज्यामध्ये द ग्रेट खली, जॉन सेना वगैरे असतात. त्याप्रकारची उद्धव ठाकरेंची ही मुलाखत होती. लहान मुलांना अशी मॅच छान वाटते. कारण त्यात मारामारी पण होते आणि कुणाला लागतही नाही, असा खोचक टोला मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. ‘केंद्र सरकारने निरोगी राजकारण करावे’ या उद्धव ठाकरेंच्या… Continue reading ठाकरेंची मुलाखत ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’च्या मॅचसारखी : संदीप देशपांडे

नारायण राणे हेच खरे सुपारीबाज : अंबादास दानवे

मुंबई (प्रतिनिधी) : ज्यांना सुपारी घ्यायची, द्यायची सवय आहे, ज्यांना स्वप्नेही तशीच पडतात, ते नारायण राणे हेच खरे सुपारीबाज आहेत, अशा शब्दात औरंगाबाद येथील शिवसेनेचे आमदार व  जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी टोला लगावला आहे. मला मारण्यासाठी विदेशात सुपारी देण्यात आली होती, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया… Continue reading नारायण राणे हेच खरे सुपारीबाज : अंबादास दानवे

ठाकरेंना मराठा नेत्यांना मोठे होऊ द्यायचे नाही : कदम

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा नेत्यांना मोठे होऊ द्यायचे नाही, असे उद्धव ठाकरेंनी ठरवले आहे. त्यामुळे मला आणि माझ्या मुलाला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला; मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरे यांचाच पालापाचोळा झाला, अशा आक्रमक भाषेत माजी आमदार रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रामदास कदम यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आणि… Continue reading ठाकरेंना मराठा नेत्यांना मोठे होऊ द्यायचे नाही : कदम

error: Content is protected !!