राजाराम तलाव पर्यटनस्थळ होण्याबाबत आ. ऋतुराज पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील राजाराम तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे आ. ऋतुराज पाटील यांनी भेट घेऊन विकास आराखडा आणि आवश्यक निधीबाबत चर्चा केली. आ. ऋतुराज पाटील म्हणाले की, तळ्यांचे शहर अशी ओळख असणाऱ्या  कोल्हापूरमध्ये सरनोबतवाडी आणि आसपासच्या परिसरातील शेतीसाठी पाणीपुरवठा करता यावा, यासाठी छ. राजाराम महाराजांनी १९२८ मध्ये ‘राजाराम… Continue reading राजाराम तलाव पर्यटनस्थळ होण्याबाबत आ. ऋतुराज पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा

इचलकरंजीतील वरदविनायक क्लबला जवाहर कारखान्यातर्फे यांत्रिक बोट प्रदान…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील वरदविनायक बोट क्लबने महापूराच्या काळात सदैव सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीचा हात दिला आहे. या क्लबने अडचणीतून मार्ग काढत अनेकांचे प्राण वाचवले आहेत. यासाठी मदतीचा हात म्हणून या क्लबला जवाहर साखर कारखान्याच्यावतीने यांत्रिक बोट देण्यात आली असल्याचे आ. प्रकाश आवाडे यांनी सांगितले.  इचलकरंजीचा कबड्डी, खो-खो बरोबरच रोईंग क्रीडा प्रकारातही नावलौकिक होत… Continue reading इचलकरंजीतील वरदविनायक क्लबला जवाहर कारखान्यातर्फे यांत्रिक बोट प्रदान…

‘ओपनिंग अप’द्वारे राज्य टप्प्याटप्प्याने होणार अनलॉक..?

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अनलॉक करण्यासाठी राज्य सरकार ‘ओपनिंग अप’ हे सूत्र अवलंबणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देण्यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. या आठवड्यात टास्क फोर्सच्या सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत अहवालावर चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय होईल, अशी बातमी एक वृत्तवाहिनीने दिली आहे.… Continue reading ‘ओपनिंग अप’द्वारे राज्य टप्प्याटप्प्याने होणार अनलॉक..?

ईएसबीसी, एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

मुंबई (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाचा ५ मे, २०२१ चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच १४ नोव्हेंबर, २०१४ पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्यात येणार आहेत. तसेच एसईबीसी आरक्षणास स्थगितीपर्यंतच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील एसईबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा मागासर्गीयांप्रमाणे ग्राह्य धरण्यात… Continue reading ईएसबीसी, एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

जिल्हा परिषदेच्या चारही समित्यांच्या सभापतीपदाची संधी महिला सदस्यांनाच…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे लक्ष लागून असतानाच सभापती पदासाठीच्या नावावर अखेर शिकामोर्तब झाले. चारही सभापतीपदे महिलांना देण्यात आल्याने विषय समित्यांवर महिलाराज असणार आहे हे निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी काल (सोमवार) पार पडल्या. यानंतर विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सभापतीपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने विषय… Continue reading जिल्हा परिषदेच्या चारही समित्यांच्या सभापतीपदाची संधी महिला सदस्यांनाच…

पन्हाळा येथे नरवीर शिवा काशिद यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथे नरवीर शिवा काशिद यांच्या ३६१ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शासनाने दिलेल्या नियमांच्या अधिन राहून समाधीस्थळावरती नगराध्यक्षा रुपाली धडेल, रवींद्र धडेल, सयाजी झुंजार, भिमराव काशिद, भगवान चित्ते यांच्या हस्ते नरवीर शिवा काशिद यांच्या समाधीवर अभिषेक आणि पूजन करणेत आले. यावेळी स्वामीनिष्ठ शिवा काशीद यांच्या जयजयकारांच्या घोषणाही देण्यात… Continue reading पन्हाळा येथे नरवीर शिवा काशिद यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवाव्यात : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : समाजातील उपेक्षित, वंचित, दीनदुबळे तसेच निराधारांसाठी शासन अनेकविध योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातुन निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. शासनाच्या या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीचे पदाधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच समाजातील प्रत्येक नागरीकाने या कामात पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. चंद्रकांत जाधव यांनी केले. यावेली कोल्हापूर उत्तर विधानसभा… Continue reading शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवाव्यात : आ. चंद्रकांत जाधव

हेर्ले येथे अतिक्रमणाविरोधात मोर्चा…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील हनुमाननगर आणि सिध्देश्वरनगर या नागरी वस्तीतून डोंगराकडे जाणाऱ्या सरकारी रस्त्यावर गावातील बापू पाटील, किरण पाटील, बाळगोंडा पाटील, आप्पासो पाटील यांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण काढावे यासाठी आज (सोमवार) हर्ले ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी मोर्चा काढला. हेर्ले गावातील हा रस्ता सरकारी असून सुमारे १५० वर्षांपूर्वीपासून या रस्त्यावर वहिवाट आहे. येथे… Continue reading हेर्ले येथे अतिक्रमणाविरोधात मोर्चा…

इचलकरंजीतील व्यापाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित (व्हिडिओ)

इचलकरंजी (प्रतिनिधी) : अत्यावश्यक सेवा सोडून सर्वसामान्य व्यापाऱ्यांची दुकाने गेल्या ९६ दिवसापासून बंद आहेत,गर्दीच्या ठिकाणाहून गर्दी कमी करण्यास प्रशासनास अपयश येत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. लसीकरण केंद्र, राजकीय पक्षाचे मेळावे, बाजारातील गर्दी, अत्यावश्यक सेवा देत असलेल्या ठिकाणच्या गर्दीबाबत प्रशासन कारवाईस तयार नसून यातून ५० ते ३०० फुटातील व्यापाऱ्यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना फोर्स मागवून… Continue reading इचलकरंजीतील व्यापाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित (व्हिडिओ)

इचलकरंजी पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी प्रयत्न करणार : तानाजी पोवार

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी पालिकेतून निवृत्त झालेल्या १२५ कर्मचाऱ्यांची उपदान (ग्रॅच्युईटी) मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच दोनशेहून जादा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रजेची रक्कमही अजून मिळालेली नाहीये. सफाई कामगारांच्या सुटीच्या पगाराचा मोबदला मागील वर्षापासून मिळालेला नाही. याबाबतचे निवेदन निवृत्त कर्मचारी यांनी तसेच इचलकरंजी नगरपरिषदेकडून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. नगरपालिकेच्या राखीव निधीतून ही… Continue reading इचलकरंजी पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी प्रयत्न करणार : तानाजी पोवार

error: Content is protected !!