दहावी निकालाचा ऑनलाईन खेळखंडोबा : अद्यापही वेबसाईट डाऊनच !

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार) ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहावा असे सांगण्यात आले. मात्र दुपारी १ नंतर काही वेळातच दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या. तब्बल पाच तासांहून अधिक वेळ झाला तरी वेबसाईट डाऊन आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी… Continue reading दहावी निकालाचा ऑनलाईन खेळखंडोबा : अद्यापही वेबसाईट डाऊनच !

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (शुक्रवार) १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्षा रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी मंत्रिमंडळाने दिली असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. गायकवाड यांनी सांगितले की, राज्य… Continue reading दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर…

‘अनलॉक’ तूर्त नाहीच ; राज्यात निर्बंध कायम राहणार : राजेश टोपे

मुंबई (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासून लॉकडाऊनचे चटके सोसत असणाऱ्या जनतेची आणि व्यापाऱ्यांची राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधातून सुटका होण्याची शक्यता मावळली आहे. राज्यातल्या कोरोना नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नसल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. आज (बुधवार)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत… Continue reading ‘अनलॉक’ तूर्त नाहीच ; राज्यात निर्बंध कायम राहणार : राजेश टोपे

मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला ‘पवारां’नाच अभिषेक घालावा…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीसाठीच्या पायी पंढरपूर वारीला राज्य सरकारनं परवानगी नाकारली आहे. अर्थात, बऱ्याच वारकऱ्यांनी या निर्णयाला विरोध आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनेही याला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्याही पुढे जाऊन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. वारकऱ्यांनी आपला संताप योग्य पद्धतीने व्यक्त केला आहे. आता… Continue reading मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला ‘पवारां’नाच अभिषेक घालावा…

राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर : २५०० हून अधिक चार्जिंग स्टेशन्स उभारणार

मुंबई (प्रतिनिधी) : इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. राज्य सरकारकडूनही नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण अधिसूचित करण्यात आले आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी वाहन खरेदी आणि नोंदणी शुल्कामध्ये सूट दिली जाणार आहे. याचा फायदा ग्राहक आणि विक्रेता अशा दोघांनाही होणार आहे. त्यासोबतच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर… Continue reading राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर : २५०० हून अधिक चार्जिंग स्टेशन्स उभारणार

‘ओपनिंग अप’द्वारे राज्य टप्प्याटप्प्याने होणार अनलॉक..?

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अनलॉक करण्यासाठी राज्य सरकार ‘ओपनिंग अप’ हे सूत्र अवलंबणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देण्यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. या आठवड्यात टास्क फोर्सच्या सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत अहवालावर चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय होईल, अशी बातमी एक वृत्तवाहिनीने दिली आहे.… Continue reading ‘ओपनिंग अप’द्वारे राज्य टप्प्याटप्प्याने होणार अनलॉक..?

ईएसबीसी, एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

मुंबई (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाचा ५ मे, २०२१ चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच १४ नोव्हेंबर, २०१४ पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्यात येणार आहेत. तसेच एसईबीसी आरक्षणास स्थगितीपर्यंतच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील एसईबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा मागासर्गीयांप्रमाणे ग्राह्य धरण्यात… Continue reading ईएसबीसी, एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवताहेत : नाना पटोले

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे तीनही पक्षाच्या नेत्यांनी कितीही सारवासारव केली तरी महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. स्वबळाची… Continue reading मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवताहेत : नाना पटोले

प्रवास महागणार ! एसटीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे काही काल बंद ठेवावी लागलेली सेवा, रोडावलेली प्रवासी संख्या, डिझेलचे वाढलेले भाव यामुळे कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागल्याने आधीच अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. यामुळे प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याचे वृत्त आहे. यामुळे प्रवाशांना जादा भुर्दंड सोसावा लागणार आहे.   सध्या एसटी महामंडळाच्या १५… Continue reading प्रवास महागणार ! एसटीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता…

जय देव जय देव जय विजय वडेट्टीवार देवा…

चंद्रपूर (वृत्तसंस्था) : भाजप-शिवसेना सरकारने २०१५ साली चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती. या निर्णयाचा जिल्ह्यातील दारू विक्रेते आणि बार व्यावसायिक यांना चांगलाच फटका बसला होता. काही दिवसांपूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. यामुळे दारू विक्रेते सुखावले. जिल्ह्यात मागील चार दिवसांत कोट्यवधींची मद्यविक्री झाली. एका बारमालकाने याचा आनंद साजरा… Continue reading जय देव जय देव जय विजय वडेट्टीवार देवा…

error: Content is protected !!