कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ६ पैकी ४ जागांवर विजय मिळवला. त्याबद्दल आज (बुधवार ) कोल्हापुरात भाजप मंगळवार पेठच्या वतीने मिरजकर तिकटी येथे साखर, पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस गणेश देसाई, मंगळवार पेठ मंडलचे अध्यक्ष सुधीर देसाई, अशोक लोहार, गिरीश साळुंखे, गणेश चिले, सुलभा मुजुमदार, महिला आघाडी अध्यक्षा गायत्री राऊत, विवेक वोरा, संतोष माळी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.