मुंबई (प्रतिनिधी) : स्वप्निल लोणकर आत्महत्येचे पडसाद पावसाळी अधिवेशनात पडले. यावेळी भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीच्या सर्व जागा ३१ जुलै पर्यंत भरणार असल्याची घोषणा केली. 

यावेळी अजित पवार यांनी अधिवेशनात निवेदन सादर केले. तसेच स्वप्निल लोणकरची आत्महत्या ही दुर्दैवी घटना होती. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून आपण सर्वांना त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एमपीएससीच्या ज्या जागा रिक्त आहे. त्या जागा ३१ जुलैपर्यंत भरून काढण्यात येणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.