औरंगाबाद  (प्रतिनिधी) : सिल्लोड तालुक्यातील भराडी महामार्गावर झालेल्या भीषण  अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (गुरूवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला. भराडी रोडवर उसाचा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला बंद पडल्याने उभा केला होता. यावर छोटा टेम्पो येऊन जोरात आदळला.  

जिजाबाई गणपत खेळवणे ( वय ६०) संजय संपत खेळवणे ( ४२), संगिता रतन खेळवणे (३५)  लक्ष्मीबाई अशोक खेळवणे (४५), अशोक संपत खेळवणे ( ५२ ) सर्व रा. मंगरुळ  अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नांवे आहेत.

छोट्या पीकअप टेम्पोतून एकाच कुटुंबातील ६  जण प्रवास करत होते. हा टेम्पो ट्रॅक्टरवर जोऊन जोराचा आदळला. यात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती या मंगरूळ तालुका सिल्लोड या गावचे  रहिवासी आहेत.  शवविच्छेदनासाठी  मृतदेह सिल्लोड रुग्णालयात नेण्यात आले आहेत.