धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील चांदे गावच्या सरपंच पदी संजय पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच सुनिता पाटील यांचा कार्यकाल संपल्याने हे पद रिक्त झाले होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी देवीदास तारडे यांनी काम पाहीले. तर ग्रामविकास अधिकारी सागर मिसाळ, तलाठी संदीप हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चांदे ग्रामपंचायत ही पाल बुद्रुक, पाल खुर्द, मोहितेवाडी आणि नागदेववाडी अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. तुळशी परिसरातील चांदे हे गाव राजकीय दृष्टीने संवेदनशील गाव मानले जाते. त्यामुळे येथील सरपंच निवड परिसरात चर्चेचा विषय ठरला होता.

यावेळी विलास पाटील, बापूसो पाटील, प्रभाकर आदिगरे, अशोक  पाटील, शिवाजी पाटील, उपसरपंच सुवर्णा पाटील, केरबा पाटील, हरिप्रसाद रोगे, विलास पाटील, सुनिता पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.