मुंबई (प्रतिनिधी) : विजयानंतर लटके यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला असता आमचं पक्षचिन्ह गोठवलं याचं दुख आहे. मशाल चिन्ह मिळालं, मशाल भडकली आणि भगवा फडकला. या विजयाचं श्रेय शिवसैनिकांना आहे. आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी बिग्रेड आणखी सुद्धा हितचिंतक आहे, त्यांना मी धन्यवाद देत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी, आता लढाईची सुरुवात ही विजयाने झाली आहे. सगळे मिळून एकत्र लढलो आणि विजय झाला. यापुढेही सगळे एकत्र मिळून लढणार आहोत आणि विजय खेचून आणू, असा विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला. ज्यांच्या मदतीने चिन्ह गोठवलं ती लोक आसपासही फिरकली नाहीत. मात्र, त्यांचे कर्तेकरवते त्यांनी पहिला अर्ज भरला. त्यानंतर त्यांना अंदाज आला आणि माघार घेतली. पण जर त्यांनी निवडणूक लढवली असती तर नोटाची मतं त्यांना मिळाली असती, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.