मुंबई – रेखा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नामवंत अभिनेत्री म्हणून ओळखली जाते . एकेकाळी रेखाने बॉलिवूड आणि तामिळ इंडस्ट्रीमध्ये राज्य केलं होत. रेखाने १९ दशकात अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलं आहे. आजही रेखाचे लाखो चाहते आहेत. रेखा जितकी तिच्या अभिनयामुळे चर्चेत असायची, तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत होती. खास करून तिचे प्रेमसंबंध आणि घटस्फोटामुळे ती खूप चर्चेत आली. रेखाच्या आयुष्यात एकेकाळी वादळ आले होते. रेखाने दोन लग्न केली पण आजही त्या एकट्याच आहेत. लग्न केल्यानंतर 6 महिन्यात त्यांच्या पतीनं आत्महत्या केली.

जेव्हा त्यांचा नवरा मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली, तेव्हा सुद्धा सगळ्यांनी रेखाला जबाबदार धरले होत. तर दुसऱ्याशी नातं तुटलं या सगळ्यासाठी रेखा यांना खूप काही ऐकावं लागलं. त्यांचे पती बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये होते. त्यासाठी औषध देखील घ्यायचे. त्यांच्या डिप्रेशनची अनेक कारणं होती. त्यांच्या पैकी एक म्हणजे रेखा यांचं चित्रपटात काम करणं होतं. त्यांची इच्छा नव्हती की रेखा यांनी चित्रपटांमध्ये काम करावं. त्यांना रेखा यांच्यापासून लांब राहायला नव्हते. पण लग्नानंतर त्या जेव्हा पुन्हा कामावर परतल्या त्या बऱ्याच दिवसांसाठी बाहेरच राहायच्या. मुकेश अग्रवाल यांनी त्यांना यासाठी नकार दिला. तर रेखा यांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली आणि ती अट ऐकल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.

रेखा यांच्या बायोग्राफी ‘रेखा: अनटोल्ड स्टोरी’ मध्ये रेखा आणि मुकेश यांनी सांगितलं की ‘1990 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यावेळी संपूर्ण देशाची अर्थ व्यवस्था ही चांगली नव्हती. याचा परिणाम मुकेश यांच्या बिझनेसवर देखील झाला. पण त्यांनी रेखा यांना त्याविषयी सांगितलं नाही. पण जेव्हा रेखा यांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली. त्यांचं लग्न दोन महिन्यात मोडलं. मुकेश यांना रेखा यांचे दूर जाणे सहन करु शकले नाही. त्यांची इच्छा होती की रेखा यांनी चित्रपटात काम करायला नको. रेखा यांनी केलेली एक मागणी त्यांच्या पतीला अमान्य होती.’ रेखा यांनी त्यांच्या पतीच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. त्यांनी मुकेश यांना सांगितलं की ‘जेव्हा त्या प्रेग्नंट होतील तेव्हा त्या चित्रपटांमध्ये काम करण बंद करतील. त्यानंतर रेखा त्यांच्या कामात व्यग्र झाल्या. पण मुकेश यांची वागणुक दिवसागणिक वाढली. त्याची जाणीव त्यांना झालीच नाही. त्यानंतर त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला. मग काही काळातच मुकेश यांनी आत्महत्या केली.’