कोल्हापूर : बारा बलुतेदारांना सन्मान आणि जातीय द्वेष संपवण्यासाठी शाहू महाराजांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवावे असे आवाहन सौ मधुरिमाराजे छत्रपती यांनी रविवार पेठेतील प्रचार फेरीत केले.

कोल्हापुरातील रविवार पेठ भागात शाहू छत्रपतींच्या प्रचारासाठी विविध समाज, तरूण मंडळे आणि माजी नगरसेवकांच्या घरी बैठका घेऊन मधुरिमाराजे यांनी शाहू छत्रपती आणि छत्रपती घराण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर निलोफर आजरेकर, अश्किन आजरेकर, माजी नगरसेवक बाळासाहेब मुधोळकर, जैबून सय्यद, राजू यादव उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रशांत खाडे यांच्या घरी सौंदत्तीच्या मानाच्या जगाचे दर्शन घेतले. यानंतर निलोफर आजरेकर यांच्या घरी भेट दिली. तसेच जय शिवराय तरूण मंडळ, बागवान समाज हॉल, तडाका तरूण मंडळ, शिवगर्जना ग्रुप, सोनटक्के तालीम, न्यू स्टार फ्रेंड्स सर्कल, दिलीप पचिंद्रे तरूण मंडळ, तडखा मित्र मंडळ या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या.

यावेळी मधुरिमाराजे म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांनी 12 बलुतेदारांना हक्‍काचे व्यवसाय जोपासण्यासाठी चालना दिली आणि त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळवून दिली. हेच कार्यपुढे नेऊन बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास करणे हे शाहू छत्रपतींचे ध्येय आहे. जातीय द्वेष पसरवण्याचे काम काही शक्‍ती करीत आहेत. त्यामध्ये बहुजन समाज भरडला जात आहे. हे संकट रोखण्याचे काम शाहू छत्रपती नक्‍की करतील.

यावेळी मुनेर महात, रतन हुलस्वार, विनायक खाडे, प्रशांत भोसले, प्रवीण सोनवणे, संजय कदम, सुमित पवार, जय शिवराय तरूण मंडळ, मधुकर शिंदे आदी उपस्थित होते