मुंबई – बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित आपल्या एका स्माईलने लाखो चाहत्यांना घायाळ करते. माधुरीने फक्त आपल्या सौन्दर्यानेच नाही तर आपल्या अभिनयानेही लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. १९ व्य शतकात दिला डान्सिंग डिवा म्हणून ही ओळखाली जात होते . माधुरीचा मोठा चाहता वर्ग आहे माधुरीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहे. त्यातला तिचा बेटा, कोयला, हम आपके हैं कोण, दिल तो पागल हैं, देवदास, तेजाब, साजन, खलनायक या सिनेमांनी माधुरीला बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करून दिली. माधुरी ही नेहमी तिच्या वैयक्तिक आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आज एक अशाच कारणाने माधुरी पुन्हा चर्चेत आली आहे. नुकताच माधुरी दीक्षित हिच्याबद्दल व्हिलन रंजीत यांनी एक अत्यंत मोठा किस्सा सांगितला.

नुकताच रंजीत यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना रंजीत हे दिसले. रंजीत म्हणाले की, प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटात मला माधुरी दीक्षितसोबत सीन शूट करायचा होता. मात्र, तो सीन शूट करण्याच्या अगोदर माधुरी रडायला लागली.हेच नाही तर तिने माझ्यासोबत काम करण्यास नकारही दिला. मुळात म्हणजे मला काय घडत आहे हेच माहिती नव्हते. चित्रपटाच्या सेटवर माधुरी येत नव्हती. या चित्रपटात माधुरी एका गरीब व्यक्तीची मुलगी होती. या चित्रपटात मला माधुरीसोबत छेडछाड करायची होती. मी विचार करत होतो की, माधुरी अजून का नाही आली.

मला माहितीच नव्हते की, काय घडत आहे. त्यानंतर शेवटी माधुरीने ऐकले आणि ती सेटवर पोहचली. त्यावेळी मला फाइट मास्टर वीरू देवगनने सांगितले की, एकाच टेकमध्ये संपूर्ण सीन शूट करायचा आहे. खलनायक खऱ्या आयुष्यात खराब नसतात हे देखील माधुरी दीक्षितला समजवण्यात आले. त्यावेळी तिने या सीनसाठी होकार दिला.प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत मिथून चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 1989 मध्ये रिलीज झाला. आता रंजीत यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. रंजीत यांची खलनायक म्हणून ओळख आहे.