सिंधुदुर्ग : निवडणुकीची घोषणा होऊनही रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात महायुतीला अजूनही उमेदवार जाहीर करता आलेला नाही ही गोष्ट दु्र्देवी असल्याचे मत उबाठा पक्षाचे नेते आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केले आहे. समोरचा उमेदवार कोणीही असो आत्ताच आमचा महाविकास आघाडीचा विजय झाला आहे असेही आमदार राजन साळवी यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीची घोषणा होऊन सुद्धा समोरच्यांचा उमेदवार जाहीर झालेला नाही ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.

रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्लाच असून खासदार विनायक राऊत हेच या ठिकाणी विजयाची हॅट्रिक करतील. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे आव्हान आम्हांला कोकणामध्ये अजिबात वाटत नाही. आमचा उमेदवार अडीच ते तीन लाखाच्या फरकाने निवडून येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही राजन साळवी यांनी सांगितले.