कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी तसेच महापूरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विशेष केंद्रीय पथक आज (मंगळवार) पाहणीसाठी आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्रीय पथकातील सदस्यांसोबत खा. धैर्यशील माने यांनी चर्चा केली. यावेळी केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्तांना भरीव निधी मिळावा अशी मागणी खा. माने यांनी केली.

यावेळी, महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती खा. माने यांनी दिली. तसेच अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन झालेल्या नुकसानीचीही माहिती पथकाच्या सदस्यांना दिली. एनडीआरएफच्या नियमांच्या बाबतीत चर्चा करून केंद्र सरकारकडून देण्यात येत असलेल्या नुकसानभरपाईच्या रक्कमेमध्ये वाढ करण्याची मागणी केली.