टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील माळवाडी भागात असणाऱ्या पाण्याच्या टाकी परिसरातील पंधरा नागरिकांची केलेले अतिक्रमण आज (मंगळवार) ग्रामपंचायतीने हटवली. या जागेमध्ये पंधरा नागरीकांनी अतिक्रमण केले होते.

माळवाडी पैकी सावरकरनगर येथील पाण्याची टाकीलगत सार्वजनिक गायरान जागेमध्ये पंधरा नागरिकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे हे अतिक्रमण काढून घेण्याबाबतची नोटीस ग्रामपंचायतीने दिली होती.  मात्र, अतिक्रमणधारकांनी बांधकाम हटवले नाही. यामुळे आज ग्रामपंचायतीने हे अतिक्रमण हटवले.

यावेळी सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, ग्रा.पं. सदस्य बाजीराव पाटील, सलीम महात, बाबासो कांबळे, विनायक कुंभार, पुष्पा पाटील, श्वेता गुरुव, संध्याराणी कुरणे, मीनाक्षी खटाळे,  सतीश पाटील, ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. भोगण, तलाठी निलेश चौगुले आदी उपस्थित होते.