मोदी किती वर्ष पंतप्रधानपदी राहतील? केजरीवालांचं मोठं भाकीत

मुंबई – सध्या लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापत चाललं आहे. सध्या देशात चार मतदान टप्पे पूर्ण झाले असून, पाचव्या टप्प्यातील मतदानाचे प्रचार सुरु आहे. आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मद्य घोटाळा प्रकरणी १ जून पर्यंत जामीन मंजूर केलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल हे जोरदार प्रचार… Continue reading मोदी किती वर्ष पंतप्रधानपदी राहतील? केजरीवालांचं मोठं भाकीत

शरद पवारांचं भाषण सुरू अन् व्यासपीठावर बॅनर कोसळला  

नाशिक : मुंबईतील बॅनर कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता राजकीय प्रचार सभेदरम्यानही डिजिटल बॅनर कोसळल्याची घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पावर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील सटाणा येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार व अवकाळी पाऊस पडत आहे. आजही वादळी वाऱ्याने शर पवारांची सभा सुरू असताना पाठीमागील… Continue reading शरद पवारांचं भाषण सुरू अन् व्यासपीठावर बॅनर कोसळला  

पंतप्रधान मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे शरद पवारांकडून कौतुक

मुंबई : महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल बुधवारी (15 मे) महाराष्ट्रात होते. यावेळी दिंडोरी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी मोदींचे भाषण सुरू असताना तेवढ्यात सभेत उपस्थित एका शेतकऱ्यांने कांद्यावर बोला अशी घोषणा दिली. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्याला… Continue reading पंतप्रधान मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे शरद पवारांकडून कौतुक

पंतप्रधान मोदी, शहा चोरांचे सरदार, पंतप्रधानांच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. २० मे रोजी निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी महाराष्ट्रात होते. यावेळी प्रचार सभेत बोलताना, नरेंद्र मोदी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टीका केली.… Continue reading पंतप्रधान मोदी, शहा चोरांचे सरदार, पंतप्रधानांच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

शरद पवारांचा नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर निशाणा म्हणाले..!

मुंबई – शरद पवार यांनी पूर्वी अनेक राजकीय पक्ष फोडले. त्यामुळे आता शरद पवारांचा पक्ष फुटला आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी खोचक शब्दात सडेत्तोर प्रतिउत्तर दिल आहे. राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणात स्थान काय आहे ?; हे मला माहीत नाही अशा शब्दांत… Continue reading शरद पवारांचा नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर निशाणा म्हणाले..!

शिंदे बाप-लेकीची जोडी भाजपात जाणार ; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

सोलापूर : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे ला आहे. सध्या राज्यातील मुंबई, नाशिक, धुळे, कल्याण, ठाणे या ठिकाणी प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती… Continue reading शिंदे बाप-लेकीची जोडी भाजपात जाणार ; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

पंतप्रधान मोदी बोलत असताना तरुण शेतकरी ओरडला कांद्यावर बोला…; नेमकं काय घडलं?

नाशिक : महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत. दिंडोरी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसची सत्ता आली तर ते अर्थसंकल्पातील 15 टक्के भाग अल्पसंख्यांकासाठी राखून ठेवतील, असं वक्तव्य मोदींनी केलं आणि तेवढ्यात सभेत उपस्थित एका तरुण… Continue reading पंतप्रधान मोदी बोलत असताना तरुण शेतकरी ओरडला कांद्यावर बोला…; नेमकं काय घडलं?

PM मोदींच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर रोहित पवारांचा पलटवार म्हणाले..!

मुंबई – सध्या लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापत चाललं आहे. लोकसभेच्या अनुषंगाने सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. आता चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, उर्वरित तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे तर पाचव्या टप्प्यातील मतदानाच प्रचार जोरदार सुरु आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची धुसमुस पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी… Continue reading PM मोदींच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर रोहित पवारांचा पलटवार म्हणाले..!

इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करेल : मल्लिकार्जुन खर्गे

लखनऊ : जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला असून इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करेल असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी लखनऊमध्ये केला. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले ,”निवडणुकीचे चार… Continue reading इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करेल : मल्लिकार्जुन खर्गे

मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण ; पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई: मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले नाते घट्ट आहे व मतांसाठी आपण काम करत नाही असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा जाहीर सभेत राम मंदिर व मुस्लीम द्वेषावर भर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, आता देशातील जनता नरेंद्र मोदींच्या थोपेबाजीला बळी… Continue reading मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण ; पटोलेंचा हल्लाबोल

error: Content is protected !!