कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान त्यांनी जनता दरबार घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या दरम्यान राजे शिरसागर यांनी एका कुटुंबाला मरहाण केली असल्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता या प्रकरणात मोठं विधान केलं आहे.

अंबादास दानवे यांनी थेट कोल्हापूर पोलीस जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना थेट फोन लावत तुम्ही गुन्हा का नोंद करून घेत नाही याचा जाब विचारला ? यापुढे पोलिसांची आणि शिरसागर यांची सुद्धा मस्ती चालणार नाही असेही त्यांनी पंडित यांना सुनावले. तसेच पिडित कूटूंबाकडे मी जात आहे. सक्षम अधिकारी पाठवा आणि त्यांच्यावर कारवाई करा असे ही म्हटले आहे.

त्यामुळे क्षीरसागर यांच्या मारहाण प्रकरणाने पुन्हा एकदा उचल खाली असून आता कोल्हापूर पोलीस याबाबत गुन्हा नोंद करणार का ? असा सवाल सर्वत्र विचारला जात आहे. त्यामुळे या प्रकरणावर क्षीरसागर नेमकी काय प्रतिक्रीया देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.