कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर युवासेना आणि ओंजळ बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने शहरातील निवडक अशा ५० वारंगणांना एक महिना   पुरेल इतके धान्य मदत स्वरुपात देण्यात आले. यावेळी कनाननगर आणि लक्ष्मीपुरी पारसिसरातील वारंगणांना ही मदत देण्यात आली. गेले काही दिवस युवासेनेच्या माध्यमातून असे कार्य सुरु आहे. इथून पुढेही हा उपक्रम सुरु राहणार असल्याचे जिल्हा युवासेना प्रमुख मंजीत माने यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, ओंजळच्या सरोज बिडकर, शहरप्रमुख शिवाजी जाधव, युवासेना उपशहर प्रमुख शेखर बारटक्के, वैभव जाधव, कुणाल शिंदे, विभाग प्रमुख रोहित वेढे, मंगेश चित्रे, तुषार इंगवले, रोहन मांगुरे, अथर्व साळोखे आदी उपस्थित होते.