कोतोली (प्रतिनीधी) : ज्योतिबाचा गुलाल ज्याच्या बाजूला आहे त्याच्यावर परमेश्वराच्या कृपेने विजयाचा गुलाल पडणार आहे. असं मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातून 85 टक्के मतदान धैर्यशील माने यांना मिळवून देऊ असं अभिवचन दिले. ‘जनसुराज्य शक्ती ज्याच्या बाजूने जाते, त्या बाजूला गुलाल पडतो’ या इतिहासाची पूर्णवृत्ती होणार अशी ग्वाही विनायरावजी कोरे यांनी दिली.

पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडी येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार महामेळावा मोठ्या उत्सहात संपन्न झाला. या ठिकाणी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थितती लावली होती.

तसेच खा. धनंजय महाडिक यांनी, विनय कोरे यांनी मनावर घेतलं की दोन्ही उमेदवार विजयी होणार हे खर आहे, कारण मला राज्यसभेवर पाठवायच श्रेय त्यांचच आहे. शाहू महाराजांचे वय झालेले असताना त्यांना लोकसभेला उभे केलंय. मग त्यांना राज्यसभेवर का पाठवलं नाही ? असा सवाल त्यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातील विकासगंगा अशीच वाहत राहण्यासाठी दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावे असं आवाहन त्यांनी केले.

यावेळी खासदार संजय मंडलिक, शेतकरी संघांचे संचालक प्रधान पाटील, संताजी बाबा घोरपडे, माजी जि. प. सदस्य शिवाजी मोरे, बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई, दगडू पाटील, प्रकाश पाटील, सरपंच दिपाली पाटील, बाबासाहेब शिंदे, बी. के. जाधव, विकास पाटील, जनसुराज्य प्रवक्ते राजेंद्र पाटील, भाजपा जिल्हासचिव संदीप पाटील, लालासो पवार, विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी, जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.