मेलबर्न (वृत्तसंस्था) : सध्या सुरु असलेल्या टी- २० वर्ल्डकपमधील उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे चिंतेत भर पडली आहे.

सामन्यापूर्वी सराव सुरु असतानाच नेट्समध्ये बॅटिंग करत असताना रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीकडे पाहता, संघावर मोठे दडपण आले असून, तो संघातून बाहेर पडल्यास एक मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे. उपलब्ध वेळेत या दुखापतीतून बरे होऊण मैदानात येण्यासाठी खुद्द रोहितसुद्धा प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. रोहितची दुखापत अधिक गंभीर नाही आणि १० नोव्हेंबर रोजी उपांत्य सामन्यामध्ये खेळण्यास त्याला कोणतीही अडचण येणार नाही. जर त्याची दुखापत गंभीर असेल तर भारतीय संघासाठी तो मोठा झटका असेल.