पन्हाळा प्रतिनिधी ( सचिन वरेकर ) ओढ्याला खेकडे पकडण्याच्या निमित्ताने पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील दोन सख्खे भाऊ गेले होते. ते अद्याप परत आलेले नाहीत. त्यामुळं ऐन दिवाळीत राक्षी गावात निरव शांतता पसरली असून, दोघांच्या शोधासाठी गावकर्‍यांची रानावनात शोध मोहीम सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील दोन सख्खे भाऊ बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ओढ्याला खेकडे पकडण्यास गेले होते. मात्र ते दोघेही घरी परतलेले नाहीत. जोतिराम सदाशिव कुंभार (वय ६४) व नायकू सदाशिव कुंभार (वय 60) अशी त्यांची नावे आहेत. नातेवाईकांनी व गावकरी दोन दिवस झाले त्यांचा शोध घेत असून देखील अद्याप ते सापडले नसल्याने ऐन दिवाळीच्या सणात घटलेल्या प्रकाराने गाव सुन्न झाले आहे.

घरच्यांनी सकाळपर्यंत परत येतील असा अंदाज धरला मात्र ते घरी परतले नसल्याने सागर कुंभार यांनी वडील व चुलता बेपत्ता असल्याची पन्हाळा पोलीसात तक्रार दाखल केली आहे. दोन दिवसापासून राक्षी गावातील शंभरहून अधिक तरूण दोघांच्या शोधासाठी परिसर पिंजून काढत आहेत. मात्र आद्याप शोध लागलेला नाही. या दोघांचा ओढा परिसरात असलेल्या तलाव व विहीरीमध्ये देखील शोध घेतला असून काहीही सुगावा लागलेला नाही.