कागल (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी  हयातभर समाजकारणाला पाठबळ दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.  पाटील यांनी केले. तसेच सर्वच जाती-धर्मांना सोबत घेऊन सामाजिक सलोख्यातून शांतता या तत्वावर ते आयुष्यभर चालत राहिले, असल्याचेही ते म्हणाले. ते कागलमध्ये आयोजीत परिवार संवाद शिबीरात बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य युवराज पाटील होते.

आज (रविवार) शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका राष्ट्रवादीतर्फे कागलमध्ये परिवार संवाद कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात केक कापून ८१ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. तसेच, मुंबईवरून लाईव्ह झालेल्या शरद पवार यांच्या वाढदिवस कार्यक्रमालाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

यावेळी गोकुळ संचालक नवीद मुश्रीफ, कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, कागल तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विकास पाटील,  रमेश माळी, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक बाबासाहेब नाईक, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक आनंदा पसारे, नगरसेवक सतीश गाडीवड्ड, नगरसेविका अल्का मर्दाने आदी मान्यवर उपस्थित होते.