पुणे ( प्रतिनिधी ) चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला. भारतीय खेळाडूंनी 100 नंबरचा टप्पा पार करत एकूंण १११ पदकांची कामे केली आहे.

आशियाई पॅरा गेम्समध्ये 100 पदकांचा टप्पा गाठणे हा निव्वळ आनंदाचा आणि कर्तृत्वाचा क्षण आहे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पाटील यांनी पुढे म्हटले कि, हे आमच्या अपवादात्मक ऍथलेटिक्ससहसांनी असे कौशल्य , समर्पण आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, हि उल्लेखनीय कामगिरी आपल्या अंतःकरणात अभिमानाच्या भावनेने भरू जाते. आमचे अभूतपूर्व क्रीडापटू , त्यांचे प्रशिक्षक आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या अतुलनिय सपोर्ट सिस्टीमबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे देखील पाटील म्हणाले.

हा विजय आपल्याला केवळ प्रेरणा देत नाहीत तर आपल्या तरुणांना कोणत्याही आव्हानांवर मात करू शकतात असा एक संदेश देखील देत असल्याचे पाटील म्हणाले. भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या 111 पदकांमध्ये 29 सुवर्णपदकं, 31 रौप्य पदकं आणि 51 कास्यपदकं यांचा समावेश आहे.