मुंबई (प्रतिनिधी) :  वुमेन्स आशिया कपमध्ये टीम इंडियाने बाजी मारली आहे. या विजयासह टीम इंडियाने सातव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं आहे. भारताने ८ विकेट आणि ६९ बॉल राखून हा मोठा विजय मिळवला आहे.

आशिया कपच्या  फायनल सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियासमोर ६५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने सहज पुर्ण केले. यामध्ये स्मृती मंधनाने सर्वाधिक ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत तिने ६ फोर आणि ३ सिक्स मारले होते. या धावांच्या बळावर टीम इंडियाने श्रीलंकेवर ८ विकेट आणि ६९ बॉल राखून सहज विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयाच्या शिल्पकार स्मृती मंधना ठरली.