कोल्हापूर ( प्रतिनिधी ) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जनता दरबार सोमवार दि. 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होत आहे. या जनता दरबारात नागरिकांनी समस्या मांडाव्यात, असे आवाहन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे. विधानसभा कामकाजामुळे या जनता दरबारावेळी मुंबईत असलो तरी पुढच्या जनता दरबाराला स्वतः उपस्थित राहून जनतेच्या मागण्या आणि समस्या पूर्ण करीन, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

गेले दोन महिने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे जनता दरबार झाला नाही. तसेच चालू पावसाळी अधिवेशनामुळे मी मुंबईत आहे. सोमवारी दि. 1 जुलै 2024 रोजी विधानसभा कामकाज असल्यामुळे मला उपस्थित राहता येणार नाही. ज्या नागरिकांचे प्रश्न असतील त्यांनी जनता दरबारात मांडावेत.

ते सोडविण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याप्रमाणे ते प्रश्न सोडवतील. पुढच्या जनता दरबाराला मी स्वतः उपस्थित राहून जनतेच्या मागण्या पूर्ण करीन आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन, असेही पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले.