बहादुरवाडी (प्रतिनिधी) : बाहदुरवाडीच्या गावाच्या पश्चिम बाजूला पांडूरंग कृष्णा देसावळे यांचा जनावरांचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे सकाळी जनावरांच्या गोठ्याची साफ सफाई करीत असताना त्यांच्यावरती कोल्ह्याने हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी असून त्यांच्या पत्नीही गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच तिथे असणाऱ्या इतर महिलांवरतीही कोल्ह्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यामध्ये चार स्त्री आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत.घटनास्थळी सरपंच नंदादेवी शिंगे, उपसरपंच महेश खोत, पोलीस पाटील ज्ञानेश्वर चांदने, माजी उपसरपंच भोजराज घोरपडे यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली.