मुंबई (प्रतिनिधी) :  कोरोनामुळे या वर्षी बालभारतीची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना प्राप्त झाली नव्हती. यामुळे समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि  स्वाध्याय पुस्तके वितरण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. ही पाठ्यपुस्तके आणि स्वाध्याय पुस्तकांची वाहतूक करण्यासाठी ई-निविदा  प्रक्रिया द्वारा मुंबईतील शिरीष कार्गो सर्विस प्रा. लिमिटेड कंपनीला वाहतूकदार म्हणून नियुक्त केले आहे. 

बालभारती भांडार ते शाळेपर्यंत ही पुस्तके वितरण करून ती पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि  कालमर्यादेत हे काम पुर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पाऊस, वारा अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे पुस्तके खराब होणार नाहीत यासाठी दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले आहे.  .

राज्यातील प्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांनी प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधीनी बालभारतीच्या भांडारामध्ये न जाता योग्य ते नियोजन करून आणि समन्वय साधून  पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.