स्वत:च्या मुलाची हत्या करणाऱ्या केसरेचे वकिलपत्र घेवू नये : राष्ट्रवादीची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथे आपल्या स्वत:च्या मुलाची हत्या करणाऱ्या निदर्यी राकेश केसरे याचे वकिलपत्र जिल्ह्यातील कोणत्याही वकीलांनी घेवू नये. अशी मागणी आज (गुरुवार) एनसीपीचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी केले आहे. याबाबतचे निवेदन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गावडे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटलं आहे की, पिता-पुत्राच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या आणि… Continue reading स्वत:च्या मुलाची हत्या करणाऱ्या केसरेचे वकिलपत्र घेवू नये : राष्ट्रवादीची मागणी

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी आज (गुरूवार) भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केली. ८० सदस्यांची नावे असणाऱ्या या यादीत महाराष्ट्रातून चित्रा वाघ, विशेष निमंत्रित म्हणून सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांचा समावेश करण्यात आला आहे. तर विजया रहाटकर यांना वगळण्यात आले आहे.   राज्यातील इतर भाजप नेते : – चित्रा वाघ,… Continue reading भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश

‘ते’ ट्विट वरूण, मेनका गांधींना भोवले : भाजपने घेतला ‘मोठा’ निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखीमपूर खेरी हिंसाचाराचा एक  व्हिडिओ ट्वीट करत आरोपींना अटक करण्याची मागणी  भाजप खासदार वरूण गांधी यांनी आज (गुरूवार) केली. तर दुसरीकडे राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी जाहीर केलेल्या ८० सदस्यांच्या यादीतून वरुण गांधींना डावलण्यात आले आहे. विशेष म्हणजे मनेका गांधी यांनाही वगळले आहे. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही यादी जाहीर केली आहे. वरुण… Continue reading ‘ते’ ट्विट वरूण, मेनका गांधींना भोवले : भाजपने घेतला ‘मोठा’ निर्णय

साखर कारखान्यांच्या संचालकांवरील छापेमारीवर अजित पवार संतापले   

मुंबई (प्रतिनिधी) : माझ्याशी संबंधित कारखान्यांवर  धाड टाकली, याचे काही वाटत नाही. पण फक्त रक्ताचं नातं आहे, म्हणून राजकारणाशी,  कंपन्यांशी दुरान्वये संबंध नसलेल्या माझ्या बहिणींवर  नाहक कारवाई केली जात  आहे,  असा संताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. केंद्रात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या कोणत्या नेत्यावर,  त्यांच्या कारखान्यावर कारवाई झाली का? असा सवाल   करून पवारांनी केंद्र… Continue reading साखर कारखान्यांच्या संचालकांवरील छापेमारीवर अजित पवार संतापले   

अधिकाऱ्यांना फक्त माहिती दिली : मनिष भानुषालींचे मलिकांच्या आरोपांना उत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : मला ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे दोषींना शिक्षा झाली पाहीजे. तसेच युवकांना नशेच्या जाळ्याच ढकलणाऱ्यांना रोखण्यासाठी मी एनसीबी अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावर कारवाई करण्याचे मला अधिकाऱ्यांनी सांगितले. या पलिकडे या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असा खुलासा मनिष भानुषाली यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. मनिष भानुशाली… Continue reading अधिकाऱ्यांना फक्त माहिती दिली : मनिष भानुषालींचे मलिकांच्या आरोपांना उत्तर

राज्यातील जि.प. च्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचाच बोलबाला..!

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ६ जिल्हा परिषदांच्या ८५ जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकीची मतमोजणी आज (बुधवार) पार पडली. भाजपने जि. प. वर पुन्हा एकदा वर्चस्व ठेवण्यात यश मिळवले आहे. भाजपने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या  आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समसमान जागा मिळाल्या आहेत. तर  शिवसेनेची कामगिरी खालावली असून १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकंदरीत या… Continue reading राज्यातील जि.प. च्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचाच बोलबाला..!

राज्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसची मुसंडी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ६ जिल्हा परिषद पोटनिवडणुकीची मतमोजणी आज (बुधवार) पार पडली. पंचायत समितीच्या १४४ जागांचे कल समोर आले असून सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तर पाठोपाठ अपक्षांनीही चांगल्या जागा मिळवल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार असून शिवसेना चौथ्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली आहे.  पंचायत समिती पोटनिवडणूक (१४४ जागा) काँग्रेस… Continue reading राज्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसची मुसंडी

एनसीबीच्या कार्यालयात अरबाज मर्चंटला नेणारा भाजपचा उपाध्यक्ष : नवाब मलिकांचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयामध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत एनसीबीचा अधिकारी नव्हता. तर भाजपचा उपाध्यक्ष होता.  याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज (बुधवार) पत्रकार… Continue reading एनसीबीच्या कार्यालयात अरबाज मर्चंटला नेणारा भाजपचा उपाध्यक्ष : नवाब मलिकांचा आरोप

शिवसेना खासदार पुत्राचा जि.प. निवडणुकीत पराभव

पालघर (प्रतिनिधी) : पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा पराभव करत भाजपचे पंकज कोरे यांनी जिल्हा परिषद निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे खा. गावीत यांना हा फार मोठा धक्का मानला जात आहे. पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत डहाणू तालुक्याच्या वणई जिल्हा परिषद गटामधून राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजेंद्र गावित… Continue reading शिवसेना खासदार पुत्राचा जि.प. निवडणुकीत पराभव

कागलच्या कुरुक्षेत्रात आमची वाटचाल विकासाच्या मुद्द्यावरच राहील : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : कागलच्या कुरुक्षेत्रात आमची वाटचाल विकासाच्या मुद्द्यावरच राहील. आजचे तरुण स्वावलंबी झाले पाहिजेत. नोकऱ्या मागणाऱ्या तरुणापेक्षा नोकऱ्या देणारे देणारे तरुण निर्माण झाले पाहिजेत, यासाठी मला सर्वांची साथ हवी आहे, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष  समरजितसिंह घाटगे यांनी केले. राजे बँकेच्या कर्जदार ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले… Continue reading कागलच्या कुरुक्षेत्रात आमची वाटचाल विकासाच्या मुद्द्यावरच राहील : समरजितसिंह घाटगे

error: Content is protected !!