सरन्यायाधीशपदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली : सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. येत्या ८ नोव्हेंबरला उदय लळित निवृत्त होणार असल्याने ७ ऑक्टोबरला केंद्र सरकारने सरन्यायाधीश उदय लळित यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सुचवण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे हे सर्वोच्चपद लागोपाठ दुसऱ्यांदा मराठी… Continue reading सरन्यायाधीशपदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (सोमवारी) सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ या नावाने प्रसिद्ध होते.… Continue reading माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या : मुख्यमंत्री शिंदे

नवी दिल्ली : ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे म्हणणे मांडण्याची मुदत ७ ऑक्टोबरला संपत आहे. त्याआधी शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात हा दावा केला आहे. तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. उद्धव ठाकरे यांनी… Continue reading धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या : मुख्यमंत्री शिंदे

मोदींनी केली मुलायमसिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधून मुलायम सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासन मोदींनी… Continue reading मोदींनी केली मुलायमसिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस

काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे-थरूर यांच्यात थेट लढत

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि केएन त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता; परंतु त्रिपाठींचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे नेते मधुसूदन मिस्त्री यांनी दिली. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट… Continue reading काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे-थरूर यांच्यात थेट लढत

मुंबईसह देशातील ८ शहरांमध्ये 5G मोबाईल सेवा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील ८ शहरांमध्ये आजपासून (१ ऑक्टोबर) 5G मोबाइल सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवा सुरू केली. देशात दोन मोठ्या मोबाईल कंपन्यांनी 5G सेवा सुरू केली आहे. एअरटेलने वाराणसीमध्ये आणि जिओने अहमदाबादमधील एका गावात 5G ची सुरुवात केली. यावेळी उत्तर प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित… Continue reading मुंबईसह देशातील ८ शहरांमध्ये 5G मोबाईल सेवा सुरु

घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाला आहे. नवे इंधन दर जारी झाले असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे, मात्र घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. दरम्यान नैसर्गिक वायूच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.… Continue reading घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे

रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचे हप्ते महाग होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  देशात आर्थिक मंदीचं संकट घोंगावत असताना आरबीआयने आणखी एक धक्का दिला आहे. आरबीआयने रेपो दरात ०.५० बेसिस पॉईंटने वाढ केली असून, यामुळे कर्जाचे हप्ते महाग होणार आहेत. नवीन कर्जेदेखील महाग होणार आहेत. आरबीआयच्या व्याज दरवाढीनंतर आता व्याजदर ५.९० टक्के इतका झाला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी चलनविषयक धोरण समितीसोबत तीन… Continue reading रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचे हप्ते महाग होणार

अविवाहित महिलांनाही गर्भपात करण्याचा अधिकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील अविवाहित महिलांनाही एमटीपी कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतातील सर्व महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतातील गर्भपात कायद्यानुसार विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कोणताही भेद नाही. अविवाहित महिला २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. एका वैद्यकीय प्रकरणाचा निकाल देताना सर्व… Continue reading अविवाहित महिलांनाही गर्भपात करण्याचा अधिकार

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावेळी सरकारने मार्चमध्ये डीए वाढवला होता. तो १ जानेवारी २०२२ पासून लागू झाला. मार्चमध्ये सरकारने डीएमध्ये ३ टक्के वाढ केली होती. म्हणजेच ती ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के केली होती.… Continue reading केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ

error: Content is protected !!