मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटक सरकारने नुकताच आपल्या विधानसभेत महाराष्ट्राचा दावा असलेली गावे कर्नाटकचीच असल्याचा ठराव मंजूर केला. यानंतर आता महाराष्ट्राकडून जसास तसे उत्तर देण्यात येणार आहे, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

सीमाप्रश्नी तोडग्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य आणि मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘आपण कर्नाटकपेक्षा अधिक सक्षम आणि परिणामकारक ठराव आणणार आहोत. आजच आम्ही हा ठराव मंजूर करणार होतो; पण भाजपच्या आ. मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने आज हा ठराव मांडता आला नाही.’ असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.