प्रोत्साहन अनुदान योजना लवकर मार्गी लावा : राजू शेट्टी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाने नियमित पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनात्मक अनुदान महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये प्रत्येकी ५० हजार रूपये अनुदानाची घोषणा केली. याबाबत अजूनही प्रशासकीय पातळीवर सचिव व अधिकारी यांच्यामध्ये संभ्रमावस्था असून, आर्थिक वर्षाच्या निकषामध्ये पुन्हा नियमित कर्जफेड करणारा शेतकरी वंचित राहणार असल्याने याबाबत पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची यादी… Continue reading प्रोत्साहन अनुदान योजना लवकर मार्गी लावा : राजू शेट्टी

सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई (प्रातिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत ढकलल्या आहेत.… Continue reading सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

‘धर्मवीर’ चित्रपट आवडला नाही : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई (प्रतिनिधी) : ‘मी धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा बनवला. तोही आवडला नाही.’ असा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा रोख हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडेच होता; मात्र त्यांनी नाव घेण्याचे टाळले. आनंद दिघे यांनी शिवसेना मोठी केली; पण त्यांना काय मिळाले? यावर देखील… Continue reading ‘धर्मवीर’ चित्रपट आवडला नाही : मुख्यमंत्री शिंदे

फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानावर भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची समजली जात आहे. या भेटीत फडणवीसांनी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे. राज ठाकरे व भाजपची वाढलेली जवळीक पाहता भेटीत… Continue reading फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतर निर्णयाला स्थगिती

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या औरंगाबादच्या आणि उस्मानाबादच्या नामांतरच्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने त्यांच्या शेवटच्या बैठकीत घेतला होता. त्या निर्णयाला आता स्थगिती देण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी घ्यायला सांगितली होती. तसे… Continue reading औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतर निर्णयाला स्थगिती

राज्यात पेट्रोल ५, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पेट्रोलच्या करात ५ रुपये आणि डिझेलच्या करात ३ रुपये कपात केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज (गुरुवारी) रात्री १२ वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक झाली. बैठकीत… Continue reading राज्यात पेट्रोल ५, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी राजेश क्षीरसागरांची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता हेही उपस्थित होते. राजेश क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांची माहिती मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. त्यांनी… Continue reading मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी राजेश क्षीरसागरांची चर्चा

शिवसेनेकडून मुंबईत स्वतःच्या फायद्यासाठी प्रभाग रचना : देवरा

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेने स्वतःच्या फायद्यासाठी मुंबई महापालिकेची प्रभाग रचना केली असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी केला आहे. शरद पवार यांनी देखील कोणी आपल्या सोबत येईल, अथवा येणार नाही, याचा विचार न करता कामाला लागण्याचे आवाहन केल्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास… Continue reading शिवसेनेकडून मुंबईत स्वतःच्या फायद्यासाठी प्रभाग रचना : देवरा

मुंबई मनपा निवडणुकीचे शरद पवारांनी फुंकले रणशिंग

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणता पक्ष आपल्या सोबत येईल, याचा विचार न करता कामाला लागा असे, असे स्पष्ट आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. या सूचक विधानावरून पवार यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकरी बैठकीत पवार बोलत होते. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘एकला… Continue reading मुंबई मनपा निवडणुकीचे शरद पवारांनी फुंकले रणशिंग

शिवसेना फुटीमागे शरद पवारांचा हात : केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनीच मदत केली. शिवाय शिवसेना सोडताना राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते, असाही गंभीर आरोप केसरकरांनी एका वृत्तवहिनीशी बोलताना केला आहे. दीपक… Continue reading शिवसेना फुटीमागे शरद पवारांचा हात : केसरकर

error: Content is protected !!