कोल्हापुरी ठसका : सर्वांचीच घरे काचेची…

समाजसेवा विविध प्रकारे करता येते. त्यासाठी हातात सत्ता असायला हवी असे काही नाही. कोणतीही सत्ता हातात काम नसताना अनेकांनी समाजसेवेचे व्रत अंगिकारले आहे. कित्येक वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सत्तेचा कधीच हव्यास केला नाही. ते जास्तीत जास्त एखाद्या पुरस्काराचे मानकरी ठरतात. अपवादात्मक एखाद्याला शासनाकडून अनुदान मिळते. सेवाव्रतींंना लोकाश्रय मात्र चांगला मिळतो, असा अनेकांचा… Continue reading कोल्हापुरी ठसका : सर्वांचीच घरे काचेची…

कोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..!

कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत गव्यांचा वावर असल्याचं स्पष्ट झाले. असं का व्हावं, असा प्रश्न प्रत्येकाला पडला. उत्तरही अगदी सोपं आहे. माणसांचा अति स्वार्थ त्याला कारणीभूत आहे, हे मान्य करावेच लागेल. निसर्गाच्या सान्निध्यात राहणे वेगळे आणि अतिक्रमण करणे वेगळे… पूर्वी वानप्रस्थाश्रम व्यवस्थेत वयोवृद्ध जंगलात जात असत. आता कुणीही उठतो, जंगलात जातो आणि तिथे अतिक्रमण करतो. आपण जंगली… Continue reading कोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..!

कोल्हापुरी ठसका : राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा योग्य, पण…

राष्ट्रवादी काँग्रेसला खऱ्या अर्थाने बळ मिळाले ते कोल्हापुरात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एकखांबी तंबूवर उभारलेली सर्कस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. कोल्हापुरात या पक्षाने बऱ्यापैकी ताकद निर्माण केली हे खरं आहे. पण, मंत्री हसन मुश्रीफ वगळता पक्षाचा अन्य कोणीही नेता प्रभावशाली ठरू शकलेला नाही. त्यामुळे सध्या तरी पक्ष मुश्रीफ यांच्या तालावर चालतो. ते म्हणतील तीच पूर्व.… Continue reading कोल्हापुरी ठसका : राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा योग्य, पण…

कोल्हापुरी ठसका : काँग्रेसला आयती संधी..!

काही वर्षांपूर्वी कोल्हापूर शहर काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र कालांतराने शिवसेनेचे बस्तान बसले आणि काँग्रेसच्या वर्चस्वाला ओहोटी लागली. आगामी निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी कशी राहणार, हे नेत्यांच्या हातात आहे. काँग्रेस म्हणजे सतेज पाटील आणि सतेज पाटील म्हणजे काँग्रेस अशीच अवस्था होण्याची अधिक शक्यता आहे. हे जरी असले, तरी इतर पक्षांची अवस्था पाहता महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व ठळक… Continue reading कोल्हापुरी ठसका : काँग्रेसला आयती संधी..!

कोल्हापुरी ठसका : शिवसेना अडकली गृहकलहात

कोल्हापूर महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांच्या हयातीत ते पूर्ण झाले नाही. त्यांच्यानंतरही शिवसैनिकांना अद्याप महापालिकेवर भगवा फडकवता आलेला नाही. मागील अनेक वर्षांपासून शहर आणि जिल्ह्यातील शिवसेना गृहकलहात अडकली आहे. त्यामुळेच शिवसेना भगवा फडकवू शकलेली नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात शिवसेनेची पाळेमुळे भक्कमपणे रुजली. मधल्या काळात शिवसेनेत बऱ्याच घडामोडी… Continue reading कोल्हापुरी ठसका : शिवसेना अडकली गृहकलहात

कोल्हापुरी ठसका : ‘मास्तर’ वारंवार का बिथरतात ?

महापालिकेच्या राजकारणात प्रत्येक पक्षाचे नेते महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. कार्यकर्त्यांची आणि पक्षाची ताकद मागे असेल तर निवडणूक सोपी जाते. आर्थिक बळही मिळते. महापालिकेवर आपले वर्चस्व असावे, असे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न असतो. त्याला विधान परिषदेसह अनेक कारणे असतात.  नेते सर्वज्ञानी असत नाहीत. ग्राउंड लेव्हलला त्यांनाही कुणाची तरी मदत घ्यावीच लागते. असे पडद्यामागे काम करणारे… Continue reading कोल्हापुरी ठसका : ‘मास्तर’ वारंवार का बिथरतात ?

कोल्हापुरी ठसका : कुछ तो गडबड है l

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूकपूर्व प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आरक्षण जाहीर झाले आहे. समाजसेवेने पछाडलेल्या इच्छुकांच्या उमेदवारीसाठी आता उड्या पडतील. नगरसेवक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विविध पर्याय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करतील. इथं पक्षनिष्ठा वगैरे काही चालत नाही. इच्छुक त्याकडे कधीच गंभीरपणे पहात नाहीत. निवडणूक लढवायची असे ठरवून समाजसेवेला प्रारंभ केला जातो. संधी मिळेल तिथे पुढे पुढे केले… Continue reading कोल्हापुरी ठसका : कुछ तो गडबड है l

पदवीधर निवडणुकीमुळे भाजप ‘चार्ज’

कोल्हापूर (समर्थ कशाळकर ): विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बॅकफूटवर गेलेल्या कोल्हापूर भाजपला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. गेल्या वर्षभरात आलेली मरगळ झटकून भाजप कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजपच्या गोटात नैराश्य पसरले होते. पाठोपाठ राज्यातील सत्तेपासून दूर राहावे लागल्यामुळेही थोडीशी अस्थिरता जाणवत होती.… Continue reading पदवीधर निवडणुकीमुळे भाजप ‘चार्ज’

…त्वरीत नियुक्ती मिळावी : सकल मराठा समाज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वी एसईबीसी मधून निवड झालेल्या महावितरणसह विविध विभागातील हजारो विद्यार्थ्यांना नोकरीत त्वरीत नियुक्ती मिळावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार संभाजीराजे छत्रपती आणि पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महावितरणमध्ये निवड झालेल्या ३२७ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाली असून अद्याप त्यांची नियुक्ती झालेली नाही. त्या नियुक्त्या… Continue reading …त्वरीत नियुक्ती मिळावी : सकल मराठा समाज

error: Content is protected !!