सोलापूर – भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे होत्या . बदलापूर ,बालिका व महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्यावर वक्तव्य करताना संताप व्यक्त केलेला आहे .
पंकजा मुंडे काय म्हणाल्या …
निर्भया प्रकरणापासून ते बदलापूर प्रकरणापर्यंतच्या महिला अत्याचारामध्ये क्रृरता वाढत असल्याचे पाहायला मिळत असून अश्या क्रृरता करणाऱ्या लोकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षांकडे लक्ष द्यायला हवं . महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सामाजिक दृष्टीकोनातून बघून त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. अशा प्रकरणावर वक्तव्य करताना त्यावर कोणतंही राजकारण केले नाही पाहिजे असे वक्तव्य पंकजा मुंडेनी केलं आहे .
मी जरी विरोधीपक्षात असते तर याचं राजकारण केलं नसतं, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी विरोधकांना अप्रत्यक्षरित्या फटकारले .त्याचबरोबर त्या म्हणाल्या की , माझ्यासाठी हा विषय अत्यंत संवेदनशील आणि हृदयाला पिळवटून टाकणारा विषय आहे. महिला अत्याचारातील आरोपी , नराधमांना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे, राज्यातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत बोलताना पकंजा मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे .