जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 28 पर्यटकाचा मृत्यू झालाय. त्यानंतर सिंधू पाणी करार मोडण्यासह भारताच्या 5 निर्णयांमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. यावर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीकडे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते पण त्याला या दहशतवादी हल्ल्याचा पुरावा नक्कीच हवा होता. भारत कोणत्याही पुराव्यांशिवाय पाकिस्तानवर आरोप करत असल्याचा दावा आफ्रिदीने केला. आफ्रिदी म्हणाला की, भारताने पाकिस्तानवर लावलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. दोन्ही देशांनी चर्चा करावी, असे आफ्रिदी म्हणाला.