दिंडनेर्ली ( प्रतिनिधी ) : ग्रामीण भागातील जनतेला पुरेसे आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलजीवन अभियानांतर्गत सुरु करण्यात आलेलया कामांची मुदत संपत आली असताना चुये (ता. करवीर ) येथील जलजीवनचे काम गेल्या दोन वर्षी पासून रखडले आहे.या कामांची सुरुवात मार्च 2023 मध्ये करण्यात आली होती.

त्यावेळी ठराविक गल्लीत पाईप घालण्याचे काम केले होते. त्यानंतर दोन वर्षीनी मे महिन्यात कामाला सुरुवात केली आहे. गावातून फाट्याकडे जाणाऱ्या मेन रस्त्यावरून पाईप घालण्याचे काम सुरु आहे. हा ररस्ता गेल्या आठ दिवसांपासून खोदला आहे. पण पाईप टाकून मुजवून घेतलेला नाही. त्यामुळे चरीतील सांडपाणी गावातील मुख्य चौकात, ग्रामपंचायत कार्यालय आणि महादेव मंदिर रस्यावरून जाऊन दलदल झाली आहे. या रस्यावरून ये -जा करण्यास, वाहतूक करण्यास नागरिकांना आणि प्रवाशांना अडथळा होत आहे.

ग्रामपंचायत प्रशासन, कंत्राटदार आणि संबधीत खात्याच्या अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले असून, या वर्षी तरी स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळेल का असा सवाल चुये नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तरी या जल जीवन योजनेचे काम पूर्ण करावे असे येथील सामाजिक कायकर्ते रणजीत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आणि ग्रामीण पुरवठा अभियंता अर्जुन गोळे यांना निवेदनाद्वारे दिले आहे.

यावेळी तेजेस मगदूम,जीवन पाटील, रणजीत पाटील, साहिल राजीगरे, माणिक कांबळे, आर. के. पाटील. सचिन माने. एस. एस. व्हनाळकर उपस्थित होते.