महाराष्ट्रातील ‘या’ गावामध्ये मारुतीच नावही घेत नाहीत..!

आहिल्यानगर : महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मारुतीचे मंंदिर पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी मारुतीचे पुजा केली जाते. पण महाराष्ट्रातील या गावामध्ये मारुतीची पुजाचं नाही तर मारुती हा शब्दही उच्चारणं चुकीचं मानलं जातं. एवढंच नाही तर या गावामध्ये मारुती नावाचा माणूसही नाही आणि मारुती नावाच्या व्यक्तीला या गावातील कोणी मुलगीही देत नाही. या गावामध्ये मारुती आणि हनुमानाला एवढा… Continue reading महाराष्ट्रातील ‘या’ गावामध्ये मारुतीच नावही घेत नाहीत..!

राज्यात अनेक भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता..!

पुणे ( प्रतिनिधी ) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. 4 एप्रिलपर्यंत हा पाऊस राहणार आहे. त्यातही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट जास्त असून, या भागात काही ठिकाणी ‘गारपीट’ होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकणात देखील अवकाळी पावसाचा तडाखा चांगलाच बरसण्याची… Continue reading राज्यात अनेक भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता..!

गुढीपाडवा का साजरा करतात ? काय आहे महत्व …

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते. चैत्र नवरात्रीलाही या दिवसापासून सुरुवात होते. याशिवाय महाराष्ट्रात गुढीपाडवा आणि सिंधीमध्ये चेटीचंद म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण या सणाचे महत्त्व आणि तो साजरा करण्याच्या विविध कथा काय आहेत हे जाणून घेवूया. गुढीपाडव्याचे… Continue reading गुढीपाडवा का साजरा करतात ? काय आहे महत्व …

श्री पद्माराजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नवोपक्रमातून पक्षासाठी केली घरट्याची अन् पाण्याची निर्मिती

शिरोळ ( प्रतिनिधी ) : सर्वच ठिकाणी वाढत्या सिमेंटच्या काँक्रिटीकरणामुळे अनेक पशुपक्षी दुर्मिळ होत चालले आहेत. दररोज अंगणात बागडणारे पशु, पक्षी नाहीसे झाले आहेत. त्यातच वाढत्या उष्माघातामुळे पशुपक्ष्यांच्या राहण्याची आणि पाण्याची गंभीर समस्या बनली आहे. यासाठी शिरोळ येथील श्री पद्माराजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक ए. ए. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक अविनाश माने आणि विनोदकुमार मगदूम यांच्या… Continue reading श्री पद्माराजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नवोपक्रमातून पक्षासाठी केली घरट्याची अन् पाण्याची निर्मिती

स्मशानभूमीत विवस्त्र तरुण..! औरवाडमध्ये खळबळ; भानामती की आणि काय?

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) : औरवाड तालुका शिरोळ एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी रात्री 2.15 च्या सुमारास, काही युवक औरवाडच्या दिशेने जात असताना त्यांना स्मशानभूमीत एक तरुण विवस्त्र अवस्थेत बसलेला दिसला. या घटनेने युवक चांगलेच घाबरले आणि त्यांनी नवीन पुलावरून आरडाओरडा सुरू केला. आरडाओरडीचा आवाज ऐकून तो तरुण उठला, कपडे घातले… Continue reading स्मशानभूमीत विवस्त्र तरुण..! औरवाडमध्ये खळबळ; भानामती की आणि काय?

वाचन संस्कृती जोमाने वाढण्यास “ग्रंथदान ” चळवळीत चंदगड तालुका अग्रेसर राहील माजी आमदार : राजेश पाटील

चंदगड ( प्रतिनिधी ) : शाळाशाळांतून वाचन संस्कृती जोमाने वाढण्यास जीवन साळोखे यांचा ग्रंथदान उपक्रम हा उपयुक्त ठरणार आहे. आणि त्यामध्ये चंदगड तालुका आघाडीवर राहील असा आशावाद माजी आमदार राजेश पाटील यांनी प्रतिपादन केले. चंदगड तालुक्यातील एकतीस हायस्कूल्स आणि ज्युनियर काॅलेजीसना ग्रंथदान समारंभात माजी आमदार पाटील अध्यक्षपदावरून बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार जीवन साळोखे… Continue reading वाचन संस्कृती जोमाने वाढण्यास “ग्रंथदान ” चळवळीत चंदगड तालुका अग्रेसर राहील माजी आमदार : राजेश पाटील

एम. टी, पाटील पतसंस्थेने सभासदांचा विश्वास जपला : आ. डॉ. विनयराव कोरे

टोप ( प्रतिनिधी ) : सभासदांच्या विश्वासास पात्र राहून तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकार करत, सामाजिक बांधिलकी जपत श्री. एम. टी.पाटील नागरी पतसंस्थेने केलेली दैदिप्यमान कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आमदार डॉ.विनयराव कोरे यांनी काढले. ते टोप येथील रौप्यमहोत्सवी श्री. एम.टी. पाटील पतसंस्थेच्या नूतन इमारत उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने होत्या,… Continue reading एम. टी, पाटील पतसंस्थेने सभासदांचा विश्वास जपला : आ. डॉ. विनयराव कोरे

स्व. विनायकराव क्षीरसागर यांच्या प्रथम स्मृतिदिनी अभिनव उपक्रम..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आमदार राजेश क्षीरसागर यांचे वडिल आणि कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष स्व. विनायकराव क्षीरसागर यांच्या प्रथम स्मृतिदिनी आज उत्तरेश्वर पेठ परिसरातील मस्कुती तलाव तरुण मंडळाच्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सर्वसामान्य लोकांसोबत कायम नाळ बांधून ठेवलेल्या आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव अग्रेसर असणाऱ्या स्व. विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनी मंडळाच्या सदस्यांनी… Continue reading स्व. विनायकराव क्षीरसागर यांच्या प्रथम स्मृतिदिनी अभिनव उपक्रम..!

महायुती सरकारचा अर्थसंकल्पात धनगर समाजावर अन्याय का ..? : आण्णासाहेब डांगे

मुंबई ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्रातील अत्यंत मागासलेल्या आणि राज्यातील लक्षणीय लोकसंख्या असलेला धनगर समाज आणि तत्सम संबंधित बाबींकडे शासनाचे संपूर्ण दुर्लक्ष असणारा हा दुर्दैवी अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी ज्येष्ट मंत्री, धनगर समाज महासंघाचे संस्थापक, मार्गदर्शक डॉ. आण्णासाहेब डांगे यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने देशभर त्यांच्या कर्तुत्वाचे गुणगान होत… Continue reading महायुती सरकारचा अर्थसंकल्पात धनगर समाजावर अन्याय का ..? : आण्णासाहेब डांगे

महिलांनी मासिक पाळी विषयी जनजागृती करणे काळाची गरज : श्रद्धा डांगरे

कळे ( प्रतिनिधी ) : आजकाल शालेय जीवनापासून मुलींच्या शारीरिक आणि मानसिक बदल समजावून देण्याची गरज निर्माण झाली असून महिलांनी मासिक पाळी विषयी मनात संकोच न करता जनजागृती करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सातारा येथील वुईरिमोर कंपनीच्या डिस्ट्रीब्यूटर आणि प्लॅटिनम डायरेक्टर श्रद्धा डांगरे यांनी केले.  गगनभरारी फौंडेशन, कोल्हापूर आणि शिवशंभो उद्योग समूह कळे… Continue reading महिलांनी मासिक पाळी विषयी जनजागृती करणे काळाची गरज : श्रद्धा डांगरे

error: Content is protected !!