मुंबई – सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु झालीय. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहे. विधानसभा निवडणूक या 20 नोव्हेंबरला होणार असून लगेच 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे जसजसे निवडणूका जवळ येत आहे तसतसे नेते आक्रमक भूमिका मांडत असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेला आलाय. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी काल एक खळबळजनक वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. आर.आर.पाटील यांनी आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत..?
संजय राऊत म्हणाले, “आबांचे केस लहान होते. ते कसाने गळा कापू शकत नाही. ते प्रामाणिक, कर्तबगार गृहमंत्री होते. त्यांनी गृहमंत्री म्हणून कधी चुकीच काम केलं नाही” असं संजय राऊत म्हणाले. आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पुढे राऊत असेही म्हणाले की, अत्यंत प्रामाणिक, कर्तबगार असे या राज्याचे आर आर आबा पाटील हे गृहमंत्री होते. त्यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून कधीच चुकीचं काम केलं नाही, असं आम्हाला वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले. तर अजित पवारांनी काल आर आर आबा पाटील यांनी जी सही केली ती दाखवली,चौकशीचे आदेश देण्याची सही जर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दाखवली असले तर तो गोपनियतेचा भंग आहे. अशा पद्धतीने गोपनियतेचा भंग करणे हा फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळे राज्यपालांनी या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला पाहिजे, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय प्रतिक्रया देतात हे पाहणे महत्वाचं असणार आहे.