मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यामध्ये ऊसाला कमी रिकव्हरी असताना देखील तिथल्या साखर कारखान्यांनी 3500 पेक्षा जास्त दर दिलेला आहे. परंतु महाराष्ट्रमध्ये चांगली रिकव्हरी असतात. तरीदेखील अनेक साखर कारखान्यांनी 2500 ते 3200 पर्यंत ऊसाला भाव दिलेला आहे. ही खऱ्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी लूट आहे.

त्यामध्ये आपण हस्तक्षेप करून ज्याप्रमाणे कर्नाटकातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव दिला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील ऊसाला योग्य भाव देण्यात यावा, अशी विनंती आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.