कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सहकार आणि दूध पट्ट्यातील सधन आणि राजकीय दृष्ट्या नियमित सृजनशीलपणे जागृत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याने या विधानसभा निवडणुकीमध्ये ही राज्यांमध्ये सर्वाधिक ७६. ६३ टक्के अश्या विक्रमी संख्येने टक्केवारीत आपले मतदान नोंदवत राज्यात पुन्हा एकदा लक्ष देऊन घेतले आहेत. यामध्ये विविध राजकीय पक्षांचं सह सामाजिक संस्था आणि जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय ,जिल्हा परिषद, महानगरपालिका महसूल विभागासह, विविध संस्था संघटनांनी सामूहिकरीत्या राबवलेल्या मतदान जनजागृतीच्या विविध उपक्रमात आहे उपक्रमाचेही यामध्ये मोलाचे योगदान लाभले आहे.

यंदा कागल ऐवजी करवीरची बाजी

कोल्हापूर जिल्ह्यातील 121 राजकीय उमेदवारांचे भवितव्य सध्या व्ही एम एम मशीनमध्ये बंद झाले आहे. दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये नेहमीच राजकीय विद्यापीठ म्हणून गौरवल्या जाणाऱ्या कागलचा सर्वाधिक टक्केवारीत प्रथम क्रमांक असतो मात्र यावेळी कागलला मागे टाकत कोल्हापूर शहरानजीकच्या करवीर विधानसभेने हा मान पटकावत 84. ९६ टक्के इतकं विक्रमी मतदान नोंदवलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आणि त्याबरोबर राज्यातील विधानसभा निहायही सर्वाधिक टक्केवारीचा मान आता करवीरने पटकावला आहे. या विधानसभा मतदारसंघाचे यापूर्वी नेतृत्व करणारे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी महायुतीकडून काँग्रेस तर्फे तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि यापूर्वी आमदारकीचा धडाकेबाज अनुभव असलेले चंद्रदीप नरके या प्रमुख उमेदवारांची लढत झाली . गेली वर्षाहून अधिक काळ या मतदारसंघात जणू निवडणुका जाहीर झाल्याप्रमाणेच चंद्रदीप नरके आणि त्यांचे बंधू अजित नरके आणि त्यांच्या टीमने अगदी अहोरात्र यंत्रणा राबवली होती. त्यांच्यासमोर आव्हान उभे करत राहुल पाटील यांनीही शेवटच्या टप्प्यात आपल्या नावाचा राहुल पीएन पाटील असा उल्लेख करत आणि वडिलांचा वसा आणि वारसा पुढे तितक्या समर्थपणाने चालवण्यासाठी संधी द्यावी असे भावनिक आवाहन करत मतदारांच्या कडे कौल मागितला. तर आपण दिवसभर नवे तर अहोरात्र मतदारांसाठी कधीही उपलब्ध आहोत आपण आपला मोबाईल नंबर थेट जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे आणि हक्काने केव्हाही आपण सर्वत्र आपत्कालीन व्यवस्थापन सह सर्व ठिकाणी गरजुंना मदत पुरवत मदतीसाठी तत्पर असतो अशा विविध पैलूंनी आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेल्या विविध कामा संदर्भाने नरके यांनी मतदारांकडे कौल मागितला आणि चुरशीच्या या टोकाच्या लढतीमध्ये जनस्वराज्य पक्षाचे संताजी घोरपडे सरकार यांनीही आपला कौल आजमावला. मतदान जवळ येऊन ठेपले असतानाच त्यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर ही त्यांनी मतदान दिवशी मतदारांना येऊन थेट संपर्क साधने अशा विविध पैलू या पैलूंनीही करवीरची निवडणूक लक्षवेधी ठरली. प्रचंड असा मतदारांच्या असलेला उत्साह आणि त्यामध्येही महिला मतदार युवा मतदार यांच्यात असलेली प्रचंड उत्सुकता यामुळेच करवीरने यावेळी राज्यात विधानसभा मतदार संघ निहाय राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद केली आहे.

त्याचबरोबर कागलने आपला ८२ . ५१ % मतदान करत राज्यात दुसरा क्रमांक नोंदवला आहे. यामध्येही गेली तीस वर्षे अखंड आमदारकी भूषवत असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर ऐनवेळी आपली पक्ष भूमिका बदलत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी घेत समरजीत सिंह घाडगे यांनी मोठे आव्हान उभे केले आहे त्यामुळे या जिल्ह्यातील दोन सर्वाधिक मतदानाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

त्याचबरोबरसर्वाधिक चुरशीची लढत झालेल्या आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे पुतणे असलेल्या ऋतुराज पाटील यांच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 84.९६ टक्क्यांनी मतदानाची नोंद झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील विविध खेडेगावातील प्रतिनिधींचा आणि नागरिकांचा नेहमी संपर्क, वास्तव असणाऱ्या कोल्हापूर शहरासह 17 खेडे गावांचा समावेश कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात आहे. त्यांना आव्हान देऊन उभे असलेले माजी आमदार अमल महाडिक आणि त्यांच्या पत्नी गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी भाजपा आणि महायुतीच्या घटक पक्षासह प्रचारात प्रारंभ बसूनच आघाडी घेतली होती. मात्र त्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वात कमी 66% मतदानाची नोंद झाली आहे.

प्रशासन, माध्यम आणि एन जीओचे संयुक्त प्रयन्त

जिल्हा अधिकारी प्रशासनाने ‘वोट फॉर रन’ मॅरेथॉनपासून ते मतदान प्रतिज्ञापत्रे ऑनलाइन फॉर्म भरून घेणे, याच बरोबरीने विविध शाळांमधून विद्यार्थ्याकडून पालक आणि नातेवाईकांसाठी मतदान करण्यासाठी आवाहन पोस्टकार्ड पत्र लिहून घेणे असे अभिनव उपक्रम राबवले. यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्तिगतरीत्या यासाठी ही आपली पन्नास किलोमीटर सायकल दौड करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्यासह जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी एस. कार्तिकेयन, महानगरपालीका आयुक्त के. मंजू लक्ष्मी , जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या टीम सह सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. अगदी बस स्थानकावर जाऊन स्टिकर लावण्यासह प्रवासी वर्गाशी साधलेला संवाद यापासून पहिल्यांदाच केलेले मतदानासाठी आवाहन करणारे सर्व सनदी अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी आणि वाहतूक पोलीस या सर्वांच्या सहभागाचे गाणे याचाही चांगलाच प्रभाव मतदान टक्केवारी वाढण्यात दिसून आला आहे.

एकंदरीत यासह स्थानिक रेडिओ स्टेशन पासून मँगो, टोमॅटो एफ एम तसेच आकाशवाणीवरून वेळोवेळी केले जाणारी आव्हाने तसेच निवडणूक ब्रँड अँबेसिडर सचिन तेंडुलकरपासून विविध अधिकाऱ्यांचे मोबाईल फोनवर येणारे मतदार जनजागृती चे संदेश यामुळे हे एक पूरक वातावरण निर्माण झाले. अशा विविध पैलूंनी जिल्ह्यात पूरक वातावरण निर्मिती झाली. परिणामी कोल्हापूर जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यात विक्रमी मतदानाची नोंद करून आपले लोकराजा राजर्षी शाहूच्या पासून सुरू असलेली पुरोगामी विचारांची परंपरा आणि लोकशाहीविषयी असलेली अपार निष्ठा ही कृतीशील पणे दाखवून दिली आहे त्यामुळेच आता कोल्हापूरच्या दहा विधानसभा निकालाकडे सर्वांचेच राजकीय दिग्गजांचे अभ्यासकांचे लक्ष लागून राहिले आहे.