कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील विविध भागात मोबाईल आणि महागड्या वस्तू चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सराईत आरोपींना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजारामपुरी पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे. विष्णू भालचंद्र माने (वय ३०, रा. तिरंगी पुलाजवळ, कोल्हापूर) आणि अक्षय दिलीप गायकवाड (वय २०, रा. तिळे गल्ली चौक, देवळकरवाडा, कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
६ मे रोजी रात्रीच्या सुमारास संशयितांनी एका तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. या घटनेची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक दुगाणे चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे, संशयितांना रोजी राजाराम तलावासमोरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
आरोपींकडून 2 मोबाईल, इतर साहित्य, असा १ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक दुगाणे चव्हाण, पोलीस उपनिरीक्षकएक. दत्तात्रय भोजने, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.