कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यातील सर्व शेतकरी चिंतेत आहे. कारण वाढत असणारे कांद्याचे दर अचानक घसरत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण सुरुच आहेत. गेल्या काही 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. तर जास्तीत जास्त दर हा 2 हजार 800 रुपये मिळत आहे. कांद्याच्या दरात घसरण होण्याचं कारण काय आहे.

बऱ्याच बाजार समित्यांमध्येही कांदा दरात घसरण सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसात 1 हजार 6 ते 2 हजार रुपयांनी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवक आणि कांदा निर्यातीत येणारे अडथळे यामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत. कांदा निर्यातीचे शुल्क लगेच मागे घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही कांद्याने आपला भाव कायम ठेवली होती. कांद्याचे दर हे 500 ते 6000 प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचले होते. सरकारी यंत्रणांमार्फत कांद्याची खुलेआम विक्री होत असली तरी त्याचा पुरवठा पुरेसा होत नाही. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून सातत्याने किरकोळ दर 60 ते 80 रुपये प्रतिकिलो दर आहेत. पण आता सध्या कांदा 2000 प्रतिक्विंटल ते 2500 रुपयाला विकत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.